
जेऊर कुंभारी वार्ताहर
देवशयनी एकादशी अर्थात आषाढ शुद्ध एकादशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाचा उत्सवाचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाऊच वसाहत येथे यावर्षी बालगोपाळांच्या सानिध्यात व सर्व पालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत बाल दिंडीचा सोहळा अतिशय आनंदात पार पडला. महाराष्ट्रात चातुर्मास हा पवित्र मानला जातो या काळात देवशयनी एकादशीला भगवंत झोपतात व कार्तिकी एकादशीला अर्थात देवउठी एकादशीला देव उठतात अशी मान्यता आहे. आपण केलेल्या कर्माचे फळ आणि कर्माचे श्रेय स्वतःकडे न घेता भगवंत शेतकऱ्याला त्याच्या कर्माचं फळ किंवा कर्माचा श्रेय देतो हा भाव यामागे आहे. विद्यार्थ्यांनी वारकरी आणि पांडुरंगाच्या वेशभूषेचा आनंद घेतला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पार पडलेल्या एकादशीच्या उत्सवात सर्व शिक्षक वृंद पालक यांनी सक्रिय सहभाग घेतला .तसेच केंद्रप्रमुख श्री रावसाहेब लांडे व आदरणीय गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.


