
जेऊर कुंभारी वार्ताहर
डॉक्टर बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव आणि जातीव्यवस्थेचा प्रतिकार करत शिक्षणाच्या बळावर आपले स्थान निर्माण केले. अस्पृश्यता जातिभेद आणि सामाजिक अन्याय या विरोधात त्यांनी लढा दिला. सामाजिक न्याय आणि समतेसाठी बाबासाहेबांनी अविरत संघर्ष केला असे प्रतिपादन आरपीआय चे राज्यसचिव दिपकराव गायकवाड यांनी केले. जेऊर कुंभारी संजय नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी आरपीआय शाखा व भीमसाम्राज्य सेना मित्र मंडळ यांचे वतीने आयोजित महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे कैवारी नाही तर भारतीय संविधानाचे शिल्पकार, शिक्षणतज्ञ अर्थशास्त्रतज्ञ व थोर देशभक्त होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही मिळाली. त्यांच्या मेहनतीमुळेच आज आपण स्वातंत्र्य,समता,न्याय आणि बंधुता या मूल्यांवर आधारित जीवन जगतो आहोत. तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार अंगीकारून त्यावर मार्गक्रमण करणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित अनुयायांनी सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन अभिवादन केले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुराव काकडे यांनी बाबासाहेबांचे स्मारकास पुष्पहार अर्पण केला. तर भीम साम्राज्य सेनेचे उपाध्यक्ष सागर जगताप यांनी संघटनेच्या वतीने संध्याकाळी मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन फेरी काढण्यात येणार असून सदर अभिवादन फेरीमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. सदर प्रसंगी संजय भालेराव,सोपान खरात, नामदेव गायकवाड,संजय आव्हाड,मनोहर गायकवाड ,भीमा साळवे,सुभाष खरात, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड, राज भालेराव,भीमसाम्राज्य सेनेचे अध्यक्ष सागर गायकवाड कार्याध्यक्ष सुमित पगारे उपाध्यक्ष सागर जगताप, दावीद धीवर, अमोल जगताप,आकाश पगारे, राहुल गायकवाड, अवि पगारे, भारत गायकवाड,बाबू शिंदे, अमोल काकडे, रवी पवार, सोमनाथ गोरे, प्रवीण गायकवाड,सचिन गायकवाड, आकाश साळवेआदींसह भीम अनुयायी उपस्थित होते.



