Tuesday, April 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedधावपळीच्या युगामध्ये मैदानी खेळ महत्त्वाचे!!- सुधाकर वक्ते यांचे प्रतिपादन

धावपळीच्या युगामध्ये मैदानी खेळ महत्त्वाचे!!- सुधाकर वक्ते यांचे प्रतिपादन

जेऊर कुंभारी वार्ताहर

आजच्या ह्या धावपळीच्या युगात वैयक्तिक जबाबदाऱ्या व मोबाईलचा अती वापर यामुळे तरुणाईला व्यायामासाठी पुरेसा वेळ देता येत नाही, अशातच मैदानी खेळातुन होणाऱ्या कसरतीमुळे व्यायामाची गरज भरून निघतेच तसेच मानसिक स्वास्थ देखील आबादीत राहते. सांघिक खेळामुळे संघटनात्मक कौशल्याचा देखील विकास होतो.अशा प्रकारच्या खेळामुळे तरूणाई एकत्र येत असून खेळ भावना वाढीस लागते असे प्रतिपादन शिवसुत्र युवा प्रतिष्ठानचे संस्थापक, भाजपा युवा मोर्चा कोपरगाव तालुका अध्यक्ष सुधाकर वक्ते यांनी केले. ते पुढे म्हणाले की, मोबाईलचा अतिवापर आणि अलीकडील काळामध्ये ग्रामीण भागांमध्ये खेळासाठी उपलब्ध असलेल्या मैदानांची संख्या कमी होत आहे किंवा मैदानाचे क्षेत्रफळ कमी होत आहे ही बाब गंभीर आहे. सांघिक खेळाच्या माध्यमातून तरुण मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असून एकीची भावना दृढ होत जाते त्यामुळे अशा प्रकारच्या मैदानी खेळांची जोपासना करणे गरजेचे आहे.
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी श्रीमंत मारूती मंदिर या ठिकाणी रोज संध्याकाळी हाॅलीबॉल हा खेळ खेळला जातो.ग्रामीण भागात तरूणांना मैदानी खेळातुन आपले ध्येय साध्य करता येऊ शकतो तसेच खेळातुन शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारना होते असे ही वक्ते म्हणाले. या मैदानी हाॅलीबॉल खेळात संजय कारभारी गुरसळ, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड,अजय गुरसळ, शरद चव्हाण ,किरण गुरसळ , विशाल गुरसळ ,संदीप राऊत , संदीप वक्ते, अभिजीत गुरसळ ,सौरव पवार ,सौरव गुरसळ, ऋषी गुरसळ, अक्षय गुरसळ, विकी जगताप ,
अथर्व गिरमे, सागर गुरसळ, अक्षय चव्हाण, बंटी मेहेत्रे, कैलास जोर्वे,बलविर गरूड , पप्पु वक्ते, यश चव्हाण ,लाला गांगुर्डे, ऋषिकेश मेहेत्रे,आदींनी भाग घेतला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!