

कोपरगाव प्रतिनिधी
दरवर्षी महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना ५सप्टेंबर शिक्षक दिनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य गुणगौरव पुरस्काराने गौरवण्यात येते. यावर्षी राज्यातील ११० शिक्षकांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र यांनी सुनिता इंगळे यांच्या कार्याची दखल घेऊन विभागस्तरातून थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य गुणगौरव पुरस्कार जाहीर केला. सदर गटातून राज्यात फक्त ८ महिला शिक्षकांना पुरस्कार दिला जातो. मुंबई येथे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. शिक्षण मंत्री दिपक केसरकर,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,शिक्षणआयुक्त सुरज मांढरे, शिक्षण संचालक प्राथमिक-माध्यमिक यांच्या शुभहस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
सुनिता इंगळे ह्या नगरपालिका शाळा क्रमांक सहा कोपरगाव या शाळेत कार्यरत असून त्या नेहमीच विद्यार्थी हित लक्षात घेऊन विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत अनेक शासन पुरस्कृत संस्थांचे पुरस्कार देखील दिले गेले आहेत. सन २०२३रोजी आयसीटी कोर्सच्या माध्यमातून शाळेला तीन लाखाची संगणक लॅब बक्षीस स्वरूपात मिळवून दिली. आज नगरपालिका शाळेतील झोपडपट्टी भागातील मुले संगणक लॅबच्या माध्यमातून एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहे. सातत्याने गेल्या १४ वर्षापासून तालुका जिल्हा व राज्यस्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यासह सहभाग घेऊन त्यांनी यश मिळवले आहे. टाकाऊतून टिकाऊ शैक्षणिक साहित्य निर्मिती,पर्यावरण पूरक उपक्रम, चिमणी वाचवा अभियान, एनसीआरटीच्या विविध कोर्सचा विद्यार्थ्यांचा सहभाग,दीक्षा पोर्टल, पीएम ई विद्या पोर्टल,विद्यादान. पोर्टलवर व्हिडिओ निर्मिती व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत,व्यावसायिक मुलाखत कौशल्य पूरक व विद्यार्थीभिमुख उपक्रम, त्यांचा स्वतःचा ज्ञान संस्कार या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरातील शिक्षकांसाठी ज्ञानाचा खजिनाच उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या ज्ञान संस्कार ब्लॉगला एक लाख वीस हजार पालक,विद्यार्थी व शिक्षक यांनी भेटी दिल्या आहेत. कोरोना कालावधीपासून आजपर्यंत शालेय परिपाठ प्रश्नमंजुषा ओळख पक्षांची, चला सोडूया शाब्दिक उदाहरणे, आकलनासहित उतारा वाचन यासारखी नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेतील विद्यार्थ्यांसह राज्यभरातही विद्यार्थ्यांना उपयोग होत आहे. आकलना सहित उतारा वाचन या उपक्रमाची मिपा औरंगाबाद यांनीही यशोगातीसाठी निवड केलेली असून लवकरच त्यावर वाचन मोड्युल विकसित होत आहे. त्यांच्या उपक्रमांची नेहमीच विविध वृत्तपत्रांनी दखल घेऊन हे उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले आहे. राज्यभरात पुस्तक दान समन्वयक म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेले असून स्वतःचे शालेय परिपाठ प्रश्नमंजुषा हे पुस्तक अनेक शाळांना भेट स्वरूपामध्ये दिले आहे.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल अहमदनगर जिल्ह्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील ,अशोक कडूस , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर प्राचार्य राजेश बनकर,वरिष्ठ अधिव्याख्याता लक्ष्मण सुपे, मुकुंद दहिफळे, गणेश मोरे,रामेश्वर लोटके,ज्योती निंबाळकर, कैलास सदगीर, पोपटराव काळे, मोहनिश तुंबारे, सुभाष पवार, राजेश डामसे,कोपरगावच्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, प्रशासन अधिकारी श्रीराम थोरात,शिक्षक बँकेचे चेअरमन शिक्षक नेते भास्कर नरसाळे,विद्या आढाव,शाळेच्या मुख्याध्यापिका सविता साळुंखे शिक्षक अरुण पगारे,आरती कोरडकर,राज्यभरातील शिक्षक,कोपरगाव तालुक्यातील जिप व नगरपालिका शिक्षण मंडळातील सर्व शिक्षक – शिक्षिका, पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.


