Saturday, April 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedलेखक आपल्या भेटीचा शतकपूर्ती सोहळा दिमाखात साजरा!!कोपरगाव येथील शिक्षकांनी केला आगळा वेगळा...

लेखक आपल्या भेटीचा शतकपूर्ती सोहळा दिमाखात साजरा!!कोपरगाव येथील शिक्षकांनी केला आगळा वेगळा उपक्रम!! – भास्कर पाटील.

श्रीम.अंजलीताई अत्रे ( इयत्ता चौथीच्या मिठाचा शोध पाठाच्या लेखिका) यांनी ऑनलाइन संवादाद्वारे महाराष्ट्रातील शंभर शाळांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना मिठाचा शोध या पाठाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या या भेटीदरम्यान त्यांना अनेक सुखद अनुभव आले त्याची गोळा बेरीज करत त्यांनी विद्यार्थी शिक्षक व पालकांना अतिशय सुंदर असे मार्गदर्शन आपल्या ऑनलाईन संवादातून केले. त्यांचा शंभरावा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संवत्सर तालुका कोपरगाव येथील झाला. श्री.पठाण फैय्यासखान , मुख्याध्यापक भागवत कर्पे व त्यांच्या संपूर्ण टीम ने खूप सुंदर कार्यक्रम केला.
त्यानंतर शतकपूर्ती सोहळा अतिशय दिमाखात ऑनलाइन झुमद्वारे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरवात श्रीमती मनिषा शिंदे ( पावाळ) यांच्या स्वागत गीताने झाली प्रास्ताविक श्री ज्ञानेश्वर सैंदाणे यांनी केले. मान्यवरांचा परिचय श्रीमती सुनिता इंगळे ( सूर्यवंशी ) मॅडम – कोपरगाव यांनी केला . अंजली अत्रेंच्या या संपूर्ण प्रवासाचा व्हिडिओ दाखवून प्रेक्षकांना त्यांच्या कार्याचा परिचय दाखविण्यात आला.शतकपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमती शबाना शेख गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोपरगाव यांनी भूषविले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की अंजलीताईंनी केलेले हे काम एक उल्लेखनीय काम आहे.विद्यार्थी पालक व शिक्षकांसाठी एक आगळावेगळा उपक्रम ठरला.विद्यार्थ्याला त्याच्या लहानपणी लेखक भेटणार ही गोष्ट त्याच्या मनात चिरकाल लक्षात राहणारी आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे श्रीमती संगीता नांदुरकर उपायुक्त धुळे महानगरपालिका यांनी सांगितले की स्त्री ही एक मोठी शक्ती आहे.समाज परिवर्तनाचे साधन आहे.बोलणारी खूप लोक असतात पण तुम्ही महाराष्ट्रातील १०० शाळांना ऑनलाईन सवांदसाधून करून दाखवल.अंजली
ताईंनी महिला म्हणून केलेले हे काम एक अभूतपूर्व काम आहे.नांदुरकर मॅडम पुढे म्हणाल्या की आपणास येणाऱ्या काळात असे काम करताना कुठलीही अडचण आल्यास एक महिला म्हणून मी जरूर मदत करेल. मा. श्री.भास्कर पाटील शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांनी अंजलीताईंच्या या उपक्रमाचे कौतुक करत म्हटले की आपण असे काम करताना मुलीसाठी ज्या समस्या आहेत त्यावर लेखन करून मार्गदर्शन करावे. श्री अनिल गुंजाळ सेवानिवृत्त सहायक आयुक्त महाराष्ट्र परीक्षा परिषद आपल्या मनोगतात म्हंटले की अंजली ताईचा मिठाचा शोध पाठ जेव्हा पुस्तकात आला तेव्हा पासून मी त्यांना ओळखतो. त्यांची विद्यार्थ्याप्रती जी धडपड आहे ती ह्या शतक पूर्तीचे गमक आहे. कोपरगाव शिक्षक टीम ने हा आगळावेगळा उपक्रम केला. त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो.
विशेष म्हणजे शतकपूर्ती कार्यक्रमासाठी अंजली अत्रेना शिकविणाऱ्या त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा भोसले सोनवणे मॅडम ही हजर होत्या.अंजली अत्रे आपली विद्यार्थीनी एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात जाऊन पोहचली. मला खूप अभिमान आहे .असे गौरव उदगार त्यांनी ताईंबद्दल काढले.या सोहळ्याला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. त्यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांमधून सोफियान नांदेड जिल्ह्यातून बोलला त्याचा बोलण्यातील भाव बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले.ताईबद्दल असलेला कृतज्ञता भावच त्याच्या बोलण्यातून दिसत होता.त्यानंतर कदमवस्ती सोमठान देश येथील सार्थक, अहमदनगर,पोहेगाव मुलेचां सिद्धार्थ, पुणे,दौंड,शिंगाडेवाडीची स्वरा यांनी आपली मनोगते व्यक्त केली.तसेच पालकांमधून श्रीमती दिपाली गाडेकर नांदूर,नाशिक ,मोहिनी बोंदरे मांडगी जिल्हा भंडारा यांनी आपले मनोगते व्यक्त केली.शिक्षकांना मधून श्रीमती राठोड जयश्री नांदूर नाशिक,श्रीमती रामेश्वरी सुतार सोलापूर, श्रीमती प्रतिभा राऊत पोहेगाव अहमदनगर, श्री.आनंद विनके दौंड पुणे,श्रीमती सूंबे निलम भाळवणी पारनेर, अंजली ताईंचे पती प्रिन्सिपल श्री.अजय कुमार राय पुणे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.अंजली ताईंची संशोधक कन्या कु.रिया राय व मोठे बंधु वकील श्री.संजीव अत्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी श्रीमती अंजली ताईंनी अत्रेंनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटल्या की लेखक मुलांना प्रत्यक्ष भेटू शकतात का? या विचाराने मी हे कार्यक्रम सुरू केले व त्याचा हा एवढा मोठा वटवृक्ष तयार झाला.तुम्ही सगळे ह्या गोष्टीचे साक्षीदार आहात.तुमचे सर्वांचे मी मनापासून आभार मानते व पुढेही ऑनलाईन ऑफलाईन भेटी चालूच राहतील असे सांगून त्यांनी आपले मनोगत पूर्ण केले.सौ संगिता आदाटे यांनी मिठाचा शोध या धाडयावर केलेली कविता सादर केली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची सूचना श्री साळुंके सुदाम व अनुमोदन श्रीमती उज्ज्वला बोरसे यांनी मांडले.तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.गणेश कहांडळ यांनी केले.आभार प्रदर्शन श्री. सुदाम साळुंके सर यांनी केले.या कार्यक्रमाचे आयोजन श्री. सैंदाणे ज्ञानेश्वर ,नवनाथ सुर्यंवंशी, सुदाम साळुंके यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!