



जेऊर कुंभारी वार्ताहर
वीर एकलव्य हे जन्मतः थोर धनुर्धारी नव्हते.किंवा त्यांना कोणत्याही गुरूकडून थेट प्रशिक्षणही मिळाले नाही.आपल्या जिद्दितून आणि कठीण परिश्रमातून तसेच स्वयं अध्ययानातून त्यांनी धनुर्विविद्येचे कौशल्य आत्मसात केले आणि थोर धनुर्धारी बनले.खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवन चरित्रातून धेय्य प्राप्तीसाठी कठीण मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्नांची शिकवण मिळते असे आर पी आय चे प्रदेश सचिव दिपकराव गायकवाड म्हणाले. जेऊर कुंभारी येथे भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळ व आर पी आय शाखेच्या वतीने आयोजित वीर एकलव्य जयंती उत्सवामध्ये कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की सर्वच महापुरुषांच्या जीवन चरित्रातून मानवी कल्याणासाठी आवश्यक अशा गुणांची आणि विचारांची शिकवण मिळतें.म्हणून महापुरुषांचे विचार आचरणात आणणे ही आज काळाची गरज आहे.सदर कार्यक्रमासाठी एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष उत्तमराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उत्तमराव पवार यांनी जयंतीच्या शुभेच्छा देताना आदिवासी मागासवर्गीय समाजामध्ये शिक्षणाची गरज असून समाजाने शिक्षित होणे गरजेचे असल्याचे सांगितले.सदर प्रसंगी माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण, भीमसाम्राज्य सेनेचे मार्गदर्शक भास्करराव वाकोडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुराव काकडे, प्रा. मधुकर वक्ते, सतिष पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.तर कार्यक्रमांचे प्रास्तविक करतांना भीमसाम्राज्य सेनेचे संस्थापक व आर पी आय. शाखेचे प्रमुख प्रदिप गायकवाड यांनी युवानेते, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री.विवेकभैय्या कोल्हे यांनी भ्रमणध्वनी व्दारे शुभेच्छा देऊन सदैव अल्पसंख्यांक, गोरगरीब मागासवर्गीय,आदिवासी समाजाच्या पाठीशी असल्याचे सांगितले . सदर
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे व आर पी आय चे युवा कार्यकर्ते प्रदिप गायकवाड, दावीद धीवर,निलेश शिंदे, सुमित पगारे, रवी पवार, अजय गोरसे, सचिन गायकवाड, सुरेश चव्हाण,सोमनाथ जगताप, आदींनी परिश्रम घेतले. यावेळी संजय भालेराव,किसन गायकवाड , भीमराव वरशिळ, भीमराव जगताप,अशोक पवार, भीमा साळवे,अमोल जगताप,आकाश पगारे, विनायक जगताप,साईनाथ वायकर,अजय पवार, श्रीनाथ पवार,पार्वती काकडे, संगिता गोरसे, करुणा चव्हाण, संगिता चव्हाण,रेखा बनसोडे, अनिता चव्हाण,अलका भवर,अनिता पवार,मंगल आव्हाड, सखुबाई गांगुर्डे,अनिता गायकवाड,सुनिता पोटे,शशिकला खरात, अरुणा पवार, भारती पवार यांचेसह शेकडो महीला पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमांचे सूत्रसंचालन रवी पवार यांनी तर अजय गोरसे यांनी आभार व्यक्त केले.


