Monday, April 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवीन वर्षात प्रत्येकाने राज्याच्या व देशाच्या विकासासाठी समतेचा विचार घेऊन काम करावे...

नवीन वर्षात प्रत्येकाने राज्याच्या व देशाच्या विकासासाठी समतेचा विचार घेऊन काम करावे – आकाश नागरे

नवीन वर्षाच्या शुभेच्छामध्ये , प्रार्थनेमध्ये सकारात्मक ऊर्जा – आकाश नागरे

कोपरगाव प्रतिनिधी – नवीन वर्ष सुरू झालं की आपण एकमेकांना शुभेच्छा देतो. जेव्हा आपण शुभेच्छा देतो, त्या शुभेच्छा अशा‌… ‘आपणास येणारे वर्ष सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो. नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो, अशी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करतो. या वेळेला जेव्हा आपण ईश्वरचरणी या गोष्टीची प्रार्थना करतो त्यावेळेला आपल्यासाठी वेगळे काही मागायची गरजच पडत नाही. कारण या प्रार्थनेमध्ये सकारात्मक ऊर्जा आहे. जेव्हा आपण चांगल्या गोष्टीचा विचार करतो त्या वेळेला ती ऊर्जा आपोआपच आपल्या मनामध्ये कार्य करू लागते आणि आपले संकल्प सिद्धीस जातात नवीन वर्षात प्रत्येकाने राज्याच्या व देशाच्या विकासासाठी समतेचा विचार घेऊन सर्वांनी काम करावे असे मत व्यक्त करून महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा
कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी दिल्या.

नवीन वर्षाची चाहूल लागली की, आपल्याला जाणवू लागतं ते आपल्या आयुष्यातलं एक वर्ष कमी झाले आहे; परंतु कमी झालेल्या वर्षांनी आपल्याला अनुभव संपन्न केलं आहे हे आपण विसरतो. नवीन वर्षाला सामोरं जाताना आनंदाने खूप ऊर्जा घेऊन काही अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने सामोरं जायला हवं. हे तर आपल्या हातात आहे‌‌ ना! पुढच्या वर्षाच्या मुठीमध्ये परमेश्वराने आपल्यासाठी काय लपवून ठेवलं आहे हे मात्र आपल्याला माहीत नाही, त्यामुळे येणारे वर्ष नक्कीच आपल्यासाठी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे वर्ष येईल अशी आशा करून आपण नवीन वर्षात पदार्पण करू या मला वाटतं प्रत्येक वर्षे हे ३६५ पानांच्या कादंबरीसारखं असतं. जीवनाची अनेक स्थित्यंतरे त्यामध्ये असतात तसेच पूर्ण, अपूर्णतेचा अनुभव पात्रांच्या संगतीने आपण जगत असतो. प्रत्येक पान काहीतरी देऊन जातं, अनुभव संपन्न बनवतं. आपल्या अनेक प्रश्नांची उकल होते. ती पात्र आपले जीवन जगत आहेत असा अनुभवही येतो. अनेक नातेसंबंधाच्या रेशीमगाठी कधी सैल होतात तर कधी जास्त घट्ट. आपल्याही आयुष्यात येणारी नवीन माणसं कधी दूर जातात, तर कधी जवळ येतात. नवीन नातीसंबंध निर्माण होतात. असंच काहीसं. एक वर्ष ही आपल्या आयुष्याची कादंबरीच असते‌‌. कादंबरी संपल्याची हुरहुर जाणवते तेव्हा आपण नक्कीच चिंतन-मनन करतो‌. त्या कादंबरीने आपल्याला काय दिलं? याचा विचार आपण करतो. तसंच आहे जेव्हा वर्ष सरतं त्यावेळेला आपण नकळत भूतकाळ डोकावतो. आपल्याला आलेल्या कडू-गोड आठवणी घेऊन आपण नवीन वर्षात पदार्पण करतो. नवीन वर्षाचं स्वागत करताना मनात एक हुरहुर असते. नव्याने सुरू होणाऱ्या 2024 वर्षं प्रत्येकास आरोग्य, समृध्दी, पर्यावरणाचे रक्षण, तसेच सर्वांची संपूर्ण संकल्पना पूर्ण व्हावे अशी शुभेच्छा आकाश नागरे यांनी दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!