


“जागतिक दर्जाचे शिक्षण ही काळाची गरज असून येणाऱ्या बदलाला शिक्षकांनी सकारात्मक पद्धतीने सामोरे जायला हवे. बदलत्या काळानुरूप स्वतः सतत अपडेट असणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणात सांगितल्यानूसार भविष्यवेधी शिक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्य वृद्धींगत होण्यासाठी तालुक्यातील सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत.” – गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी
“कोपरगाव तालुक्यातील सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कायमच अग्रेसर असतात.सदर प्रशिक्षणातून सर्व शिक्षक आपल्या शाळेवर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण देण्याचा प्रयत्न करतील अशी मला आशा वाटते.” – गटशिक्षणाधिकारी शबाना शेख
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेरचे प्राचार्य लक्ष्मण सुपे, जिल्हा समन्वयक रामेश्वर लोटके, शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण तिसरा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेला आहे.
सदर प्रशिक्षण पाच दिवशीय असून तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी सदर प्रशिक्षणाचे आयोजन तालुकास्तरावर करण्यात आलेले आहे.प्रशिक्षणाचा पहिला टप्पा सी.एम.मेहता कन्या विद्यामंदिर कोपरगाव आणि दुसरा व तिसरा टप्पा केबीपी विद्यालय कोपरगाव या ठिकाणी डिजिटल वर्गांची व उत्कृष्ट बैठक व्यवस्थेची निवड करून करण्यात आला. सदर प्रशिक्षणासाठी सर्व शिक्षकांना चहा व भोजनाचे उत्कृष्ट रित्या नियोजन करण्यात आले होते. सदर तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे उत्कृष्ट नियोजन तालुका समन्वयक संजय दहिफळे यांनी केले आहे.
प्रत्येक मुलाला जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, जागतिक दर्जाची स्वीकार्यता विद्यार्थ्यांना लाभावी व भविष्याचा वेध घेणारी व्यक्तिमत्वे विकसित व्हावी. या अनुषंगाने तालुक्यात अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याचे आयोजन के बी पी माध्यमिक विद्यालय या ठिकाणी करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे तीन यशस्वी टप्पे पूर्ण झाले असून त्या अंतर्गत आतापर्यंत तालुक्यातील ४६५ शिक्षकांना प्रशिक्षण यशस्वीरित्या देण्यात आलेले आहे. प्रशिक्षण टप्पा क्रमांक तीनच्या अंतिम दिनी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी प्रशिक्षण वर्गाना भेट देऊन सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मूल गतीने शिकते, एकविसाव्या शतकातील कौशल्य, भविष्यवेधी शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबी, स्वयंप्रेरणा,अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर ही या प्रशिक्षणाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. या प्रशिक्षणात शिक्षकांनी व्हिडिओ पाहून आपले विचार, चिंतन स्वाध्याय रूपात लिहिणे हा या प्रशिक्षणाचा आत्मा आहे.
या प्रशिक्षणाबद्दल शिक्षकांनी आपले अभिप्राय कविता करून,लिखित स्वरूपात उत्कृष्ट असे दिलेले आहे. या प्रशिक्षणात सुलभक म्हणून कोपरगाव तालुक्यातील पदवीधर शिक्षक प्रमोद रणधीर, लक्ष्मण पंडोरे, प्रदीप भाकरे, कैलास रामकर,वसंत भातकुडव, नवनाथ सूर्यवंशी, रविकिरण भोजने,सचिन आडांगळे,सुनिता इंगळे हे सर्व सुलभक म्हणून कामकाज पाहत आहेत.


