Thursday, April 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारावर मार्गक्रमण करणे हीच त्यांना खरी आदरांजली!!-दिपकराव...

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारावर मार्गक्रमण करणे हीच त्यांना खरी आदरांजली!!-दिपकराव गायकवाड

जेऊर कुंभारी वार्ताहर
६ डिसेंबर हा दिवस केवळ दलितांसाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीयांसाठी अतिशय दुःखाचा दिवस आहे. कारण १९५६ साली याच दिवशी दीन दलितांचे उद्धारकर्ते, कष्टकरी आणि सोशितांचे जीवन ज्ञानरूपी प्रकाशने तेजोमय करणारे महामानव,मी प्रथमता भारतीय असे सांगणारे सच्चे देशभक्त, संपूर्ण विश्वाला आदर्श ठरणारे आणि राष्ट्राची एकात्मता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा अबाधित राखणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. असे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता,न्याय आणि बंधुता आदी विचार मांडले. त्यांचे हेच विचार अंगिकारून त्यावर मार्गक्रमण करणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल असे आर पी आय चे प्रदेश सचिव आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष दिपकराव गायकवाड म्हणाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक संजयनगर, जेऊर कुंभारी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त आर पी आय शाखा व भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. सदर प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुराव काकडे यांनी डॉ बाबासाहेब यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण केला.यावेळी उपस्थित जनसमुदायाने सामुहीक त्रिषरण व पंचशील म्हणत स्मारकास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. ज्येष्ठ मार्गदर्शक भास्करराव वाकोडे यांनी बाबासाहेबांचे कार्य महान आल्याचे सांगत स्मारक समितीच्या वतीने अभिवादन केले तर सुनिताताई दिवे यांनी गावातील महीला बचत गटाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आर पी आय शाखा प्रमुख व भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे संस्थापक प्रदिप गायकवाड यांनी दरवर्षी प्रमाणे संघटनेच्या वतीने सायंकाळीं ७:३० वाजता मेणबत्ती प्रज्वलीत करून अभिवादन फेरी चे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत सर्व अनुयायांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
सदर प्रसंगी पोलिस पाटील बाबासाहेब गायकवाड,संजय भालेराव, बाळासाहेब पगारे,भीमराव वरशिळ, सोपान खरात,आनंदा चव्हाण, बंडू चव्हाण, पिलू गायकवाड,बबलू भालेराव, मनोहर गायकवाड, चांगदेव गायकवाड,शिवराम गायकवाड,भीम साळवे,सुनील खरात,गोरख चव्हाण, विष्णू काकडे ,सतीश रणधीर,चित्रा ताई गायकवाड, मंदाताई वाकोडे, सोनू बाईजाधव,कांताबाई कोळे आदींसह भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष सुमित पगारे, सदस्य निलेश शिंदे, दावीद धीवर, सुरेश चव्हाण, अवि पगारे, अमोल काकडे, धीरज आव्हाड आदींसह भीम अनुयायी उपास्थित होतें
.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!