Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedवन विभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा!!- सरपंच सुवर्णा पवार

वन विभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा!!- सरपंच सुवर्णा पवार

जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीने दिले वनविभागाला निवेदन!!

जेऊर कुंभारी वार्ताहर

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावात मागील दोन वर्षापासुन बिबट्याने धुमाकूळ घातला आहे .रात्री अपरात्री बिबट्या शेतात फिरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे आत्ता पर्यंत बिबटयाने अनेक जनावरांचा बळी घेतला आहे त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान ही झालेले आहे तेव्हा वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा यासाठी सरपंच सुवर्णा पवार यांनी जेऊर कुंभारी ग्रामपंचायत मार्फत वन विभागाला लेखी निवेदन दिले आहे. निवेदनात असे म्हटले आहे की जेऊर कुंभारी ,चांदेकसारे,डाऊच खुर्द, डाऊच बुद्रुक नगादवाडी, पानमळा आदी करून गावामध्ये बिबट्याने पाळीव प्राणी हल्ला मोठ्या प्रमाणात वाढले आहेत दोन महिन्यापूर्वी जेऊर कुंभारी गावातील सुनील चव्हाण यांच्या गोठ्यात बांधलेल्या बोकडेवर बिबट्याने हल्ला करून बोकड ठार केला आहे त्याचप्रमाणे डोऊच खुर्द गावामध्ये बिबट्याने पाळीव प्राण्यावर सुद्धा हल्ला केलेला आहे,तसेच संतोष चव्हाण हे पहाटे कामावर जात असताना बिबट्याने हल्ला केला मागील महिन्यात चव्हाण वस्ती, दांदडे वस्ती ,आव्हाड वस्ती, गिरमे वस्ती या ठिकाणी बिबट्या आढळून आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक वेळा लेखी तसेच तोंडी पाठपुरावा करून ही वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त काही होईना त्यामूळे जनमानसातुन संताप व्यक्त होत आहे ,बिबट्याच्या हल्ल्यात अनेक पाळीव जनावरे शेळ्या बकऱ्या लहान लहान वासरे मृत्युमुखी पडून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे तसेच मानवी जीवाला पण भिती निर्माण झाली आहे. शेळ्या बकऱ्या कुत्रे इत्यादी प्राण्यांना बिबट्या आपले भक्ष्य करून मारून खात असल्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.एकीकडे विजेचे वेळापत्रक कधी दिवसाचे तर कधी रात्रीचे असल्यामुळे रात्री अपरात्री शेतात जाण्याची शेतकऱ्यांना गरज असते आता रब्बी हंगामातील गहू हरबारा कांदा मका ही पिके जोमात असल्यामुळे आणि उन्हाचा चटका वाढू लागल्यामुळे पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली असली तरी पण जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना शेतात जाणे भाग पडते आणि अशातच बिबट्याची दहशत वाढल्यामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असुन आता नागरीकांचा संयम सुटला आहे. या पाश्र्वभुमीवर वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करुन ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच गावठाण येथे पिंजरा लावण्यात यावा
अशी मागणी सरपंच सुवर्णा पवार,उपसरपंच अनिता वक्ते यांनी निवेदनात केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!