
कोपरगाव प्रतिनिधी
मागील काही महिन्यांपूर्वी अर्थात दि. ३१ जुलै २०१३ रोजी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मिळावी म्हणून काँग्रेसच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते परंतु शासनाचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते स्थगित केलेले आमरण उपोषण पुन्हा सुरु सुरू करणार असल्याची माहिती श्री. विजय सुधाकर जाधव यांनी सिंह महाराष्ट्र न्यूज ला दिली आहे यात सविस्तर वृत्त असे की दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्यावतीने कोपरगाव तालुक्यातील उर्वरित सर्व शेतकन्यांना साल २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे झालेले नुकसान भरपाई म्हणून महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली मदत ही तातडीने मिळावी ह्या करिता कोपरगाव तहसिल कार्यालयाबाहेर बेमुदत आमरण उपोषण पुकारले होते त्या अनुषंगाने उपोषण सुरु केले होते. परंतु
महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी या नात्याने उपोषणकत्यांची उपोषणस्थळी येऊन चर्चा केली होती व शासनाच्या वतीने लाभार्थी शेतकऱ्यांची यादी लवकरात लवकर शासनाला देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. व लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या खात्यात अपेक्षित रक्कम जमा करण्यासाठी पाठपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते अशी सखल चर्चा होऊन व शासन प्रतिनिधींच्या विनंतीस मान देऊन उपोषण करते श्री विजय जाधव पद्मकांत कुदळे योगेश गंगवाल आदींनी उपोषनाच्या दिवशी सायंकाळी शासन प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांचे सुरू असलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले होते. त्यास आज जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे परंतु अद्यापही नुकसानग्रस्त शेतकन्यांच्या खात्यात कुठलीही रक्कम जमा झालेली नाही. आधीच ह्या वर्षी कोरडा दुष्काळाची परीस्थीती आहे व शेतकऱ्याचे उभे पिक हाती पडण्याची शक्यता नसल्यात जमा आहे तसेच मा. जिल्हाधिकारी साहेबांना दिलेल्या अहवालात यावर्षी खरीपात जवळपास उत्पन्नात ८०% पेक्षा जास्त घट असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झालेला आहे. अश्यावेळी त्यास आर्थिक आधाराची अत्यंत आवश्यकता आहे.
त्यामुळे जर येत्या आठवडाभरात नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या खात्यात कुठलीही अटीविना व E-KYC करायला न लावता महाराष्ट्र सरकारने यावर्षी दिलेल्या कांदा अनुदानाप्रमाणे थेट लाभाय्याने दिलेल्या खात्यात वर्ग करावे. याआधी EKYC करणे बंधनकारक राहिल अशी कुठलीही अट यापूर्वी नव्हती परंतु राज्य सरकारने नव्याने हा निर्णय जाहीर करून वेळ काढू पणाचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. असेही विजयराव जाधव म्हणाले पुढे ते म्हणाले की असे करणे म्हणजे आधीच नुकसानीने ग्रस्त असणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा विनाकारण आर्थिक व मानसिक छळ करण्यासारखे आहे. वरील अट ही रद्द करण्यात यावी व अनुदानाची रक्कम ही थेट खात्यात वर्ग करावी
अन्यथा दिनांक ३१ जुलै २०१३ रोजी स्थगित केलेले आमरण उपोषण आता कुठल्याही मुदतीशिवाय म्हणजे बेमुदत आमरण उपोषण तहसिल कार्यालय कोपरगाव यांच्या कार्यालयाबाहेर दिनांक २५ सप्टेंबर २०२३ सोमवार पासून पुन्हा सुरु
करण्यात येईल.तसेच त्यांनी तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना देखील आव्हान केले की आपण आपल्या मागणीसाठी येत्या २५ तारखेला तहसील कार्यालयासमोर उपोषणास हजर राहावे


