
जेऊर कुंभारी वार्ताहर
गोदावरी उजव्या कालव्यातून आवर्तन सुटून महीना उलटून गेला तरीही हरीसन ब्रँचचारी ला अद्याप पाणी नाही,आवर्तन सुटल्यानंतर चितळीला पाणी पोहोचल्यानंतर हरिसन ब्रँचचारी ला तिसऱ्या दिवशी पाणी दिले जाते परंतु पाणी वेळेवर न दिल्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झाली आहे.
पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे असे असा आरोप महारुद्र फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत वक्ते यांनी केला आहे. वेळेवर पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे खरिपाच्या पिकाचे नुकसान झाले आहे तसेच मागील वर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती तोंडाशी आलेला घास हिसकावला गेला आहे अजूनही जेऊर कुंभारी गावातील शेतकऱ्यांना अवकाळीचे अनुदान मिळाले नाही तसेच पंचनाम्याचे कागदपत्र तहसीलदार कार्यालयात पाठवण्यात टाळाटाळ करण्यात आली व तोंड पाहून कागदपत्रे जमा करण्यात आली शेतकऱ्यांनी वेळेवर कागदपत्र देऊन ही जेऊर कुंभारी येथील शेतकरी अवकाळी अनुदानापासून वंचित आहे त्यामुळ शेतीवर वर्गात असंतोष निर्माण झाला आहे तेव्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी खरीपात कमी पाण्यावर कसेबसे सोयाबीन, मका,कपाशी पिके घेतलेले होती त्यांना वेळेवर पाणी न मिळाल्यने उभे पिक जळून गेली
हरिसन ब्रँचचारीने जेऊर कुंभारी,
चांदेकसारे ,डाऊच खुर्द या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळत असते जनावरांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे
पण आता परिस्थिती बदलली आहे पाटबंधाऱ्याच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी वेळेवर न सोडल्यामुळे या भागामध्ये शेतकऱ्यांना शेती करावी की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे आवर्तन सुटल्यानंतर कायमच जेऊर कुंभारी गावातील शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाच्या ऑफिसला जाऊन पाण्यासाठी भांडावे लागत आहे असे जर कायमस्वरूपी चालले तर मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा महारुद्र फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत वक्ते यांनी दिला.


