
जेऊर कुंभारी वार्ताहर
५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक दीपस्तंभ व अक्षरधन पब्लिकेशन तर्फे म्हणींवर आधारित काव्यसंग्रह २०२३ प्रकाशित करण्यात आला . त्याचप्रमाणे शिक्षकदिनाचे औचित्य साधून साहित्यिकांना दीपस्तंभ व अक्षरधन पब्लिकेशन प्रकाशनच्या वतीने दीपस्तंभ साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी वात्रटिकाकार संजय तांदळे हे उपस्थित होते . प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यरत्न श्री संजय पठाडे सर, सह्याद्री भूषण बाळासाहेब शिंगोटे आणि अक्षरधन प्रकाशनच्या प्रकाशक प्रतिभा साळुंखे उपस्थित होत्या. अध्यक्ष संतोष तांदळेंच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . संजय पठाडे यांच्या हस्ते सर्व मान्यवर साहित्यिकांना दीपस्तंभ साहित्यरत्न सन्मानपत्रांचे वितरण करून त्यांना गौरविण्यात आले . त्यांनी आपल्या भाषणात साहित्यिक हा समाजाचा आरसा असतो . असे ते म्हणाले . प्रास्ताविकातून संपादक सुदाम साळुंखे यांनी अंक निर्मितीची पार्श्वभूमी स्पष्ट केली . आजपर्यंत त्यांनी विविध विषयावर आधारित सुमारे १७ अंकांची निर्मिती केलेली आहे . रामेश्वरी सुतार-सोलापूर, प्रा. नागेश सोपान हुलवळे – डोंबिवली (अहमदनगर), स्वाती शेटे (रायगड), सीता चंदेल ( नांदेड), धिरज म्हात्रे ( मुंबई ) यांनी अंकाविषयी मनोगत व्यक्त केले. सीता चंदेल यांनी संपादक सुदाम साळुंखे यांच्यासोबत साहित्यिक कार्य करताना माझ्या मनाला पुन्हा एकदा आयुष्य जगण्यासाठी उभारी मिळाल्याचे सांगितले . संपादकीय मंडळात करुणा गावंडे, रेखा शिंदे ,जया कुलथे, वनवाला पाटील, रूपाली गोदवडकर ,कविता पुदाले ,वर्षा सांगवीकर यांचा समावेश आहे. ज्ञानेश्वर सैदाने यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता चव्हाण – पुणे आणि कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण व आभार प्रदर्शन नवनाथ सूर्यवंशी यांनी केले.


