





जेऊर कुंभारी वार्ताहर
हॅरिसन ब्रँच शाळेत भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रभात फेरी काढण्यात येऊन विद्यार्थ्यांनी भारतमाता की जय,वंदे मातरम,स्वातंत्र्य दिनाचा विजय असो,जय जवान जय किसान अशा घोषणा देत परिसर देशभक्तीमय केला.यानंतर ध्वजवंदन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होऊन ध्वजारोहण शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना डोंगरे यांनी केले. सदर प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतिष आव्हाड यांनी भूषविले.प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याचे भूमिपुत्र व सध्या हाँगकाँग या देशात स्थायिक असलेले तेथील एचएसबीसी बँकेचे कार्यकारी संचालक विशाल आव्हाड,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव वक्ते,सरपंच सुवर्णा पवार,माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यशवंत आव्हाड,गंगुबाई जाधव उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थीनी मराठी,हिंदी व इंग्रजीतून भाषणे केली.विद्यार्थ्यांनी मेरी माटी,मेरा देश उपक्रमांतर्गत शाळा स्तरावर हस्ताक्षर स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या लाठीकाठी सादरीकरणाने पण उपस्थितांचे मने जिंकून घेतली.तसेच देशभक्तीपर गीतांवर नृत्ये सादर करून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
मिशन आपुलकी अंतर्गत शाळेसाठी लोकसहभाग देणाऱ्या पालकांचा व ग्रामस्थांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.यात गौरव सानप,माजी सरपंच यशवंत आव्हाड, सतिष पवार,कमलेश जाधव,राहुल सपकाळ,पंकज सराफ,दीपक बोऱ्हाडे,किरण ढोले,लतिफ पठाण, संदिप पवार,रोहित दळवी,विकास चकोर,शैलेश दळवी,ज्ञानेश्वर देवकर,शिवाजी गांगुर्डे, रविंद्र माळी,असिर शेख,प्रकाश बर्डे,दिनकर बर्डे,योगेश जाधव,संतोष मोरे,जावेद शेख,श्रीकांत मोरे या सर्व दात्यांचे गुलाब पुष्प व सन्मानपत्र देऊन आभार व्यक्त करण्यात आले.
सदर प्रसंगी गौरव सानप यांनी त्यांचे वडील कैलासवासी रामचंद्र सानप यांच्या स्मरणार्थ शाळेत आंब्याचे झाड लावून वृक्षारोपण केले.यावेळी विशाल आव्हाड,संचालक सतिष आव्हाड,सरपंच सुवर्णा पवार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतिष पवार यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नवनाथ सूर्यवंशी व आभार मुख्याध्यापिका रंजना डोंगरे यांनी मानले.


