
जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून डाऊच खुर्द,
जेऊर कुंभारी चांदेकसारे, घारी आदी करून गावांमध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
दि १०ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास डाऊच खुर्द येथील गोरक सोमाजी पुंगळ यांच्या गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्यांवर बिबट्यानाने हल्ला करून एक जागिच ठार केला आहे. अंदाजे आठ ते नऊ हजार रूपये किंमतीचा विक्रीला आलेली शेळी ठार झाल्यामुळे गोरक पुंगळ या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेने डाऊच खुर्द परिसरातील भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाकडून या बिबट्याचा बंदोबस्त होत नसल्याने शंकर गुरसळ जिनिंग प्रेसिंग संचालक, माजी सरपंच संजय गुरसळ तसेच जेऊर कुंभारी येथील सरपंच सुवर्णा पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वन विभागाला वारंवार कळवून देखील बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश येत आहे. फक्त वेगवेगळी कारणे देऊन चालढकल करण्यात वनविभागाचे अधिकारी धन्यता मानत आहेत तर याचा काय उपयोग असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात अनेक पाळीव जनावरे शेळ्या बकऱ्या लहान लहान वासरे मृत्युमुखी पडून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे तसेच मानवी जीवाला पण भीती निर्माण झाली आहे. शेळ्या बकऱ्या कुत्रे इत्यादी प्राण्यांना बिबट्या आपले भक्ष्य करून मारून खात असल्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.


