
कोपरगाव प्रतिनिधी
ग्रामिण अर्थकारणाला सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून एक मजबूत पाठबळ दिले असुन माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशात साखर उद्योग अत्याधुनिक वळणावर येण्यासाठी ज्या जबाबदारीने काम केले त्यांच्याच पावलावर पाउल ठेवत जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे काम करत असून शेतक-यांचे प्रति एकरी उत्पादन वाढले पाहिजे यासाठी त्यांचे प्रामाणिक प्रयत्न असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक धट यांनी केले. श्रीगणेश साखर कारखाना कार्यक्षेत्रात सभासदांचे प्रति एकरी उस उत्पादन वाढावे यासाठी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व उस संशोधन संस्था कोईमतूरचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी या मार्गदर्शक मेळाव्याचे आयोजन केले होते त्याप्रसंगी अहमदनगर जिल्हा मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्यावतीने या उभयतांचा सत्कार करताना श्री. दिपक धट बोलत होते. शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे बेणे व लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात विवेक कोल्हे यांनी जिल्ह्यात आघाडी घेतली आहे., त्याचबरोबर विविध सामाजिक कार्यात देखील त्यांचा मोलाचा सहभाग आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष या नात्याने ते शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम सदैव करतात, असेही धट म्हणाले.
याप्रसंगी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब सुराळकर, जिल्हा संघटक शिवाजीराजे चौधरी, वसंतदादा मल्टीस्टेट संस्थेचे अध्यक्ष मुकुंद सिनगर, राहाता तालुकाध्यक्ष उत्तमराव घट, येवला शहराध्यक्ष रविंद जगताप, कोपरगांव तालुका सचिव सोमनाथ राशिनकर, संघटक रवींद्र ठोंबरे, राजेंद्र लोहाटे, अमोल नाईकवाडे, शामराव चव्हाण, ऋग्वेद खैरनार आदि जिल्हा मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


