

कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील रहिवासी असलेले अशोक राणू वाघ यांच्या मुलीला गुरुवारी सकाळी सकाळच्या सुमारास चास येथील कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती साठी नेण्यात आली असताना सदर आरोग्य केंद्रात डॉक्टरच व कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आणि सदर महिलेला अतिशय वेदना होत होत्या त्यावेळी तिथं उपलब्ध असलेल्या सिस्टर यांनी धामोरी येथील आरोग्य उपकेंद्रात नेण्यासाठी सांगितले परंतु सदर गरोदर महिलेला नेण्यासाठी असलेले रुग्णवाहिकेमध्ये पुरेशे डिझेल नव्हते असे कारण दिले आणि सदर महिलेला धामोरी येथे प्रसूती साठी नेण्यात आले सदर महिलेचे प्रसूती झाल्यानंतर अतिशय रक्तस्त्रावामुळे सदर महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी राज्य शासनाने हजारो कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र, कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने या महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे दरम्यान काही महिन्यांपूर्वीच याच आरोग्य केंद्रात रात्रीच्या सुमारास डॉक्टर उपलब्ध नसल्याने एका महिलेची प्रसूती ही रुग्णालयच्या गेटवर झाली होती तद्नंतर गेल्या काही दिवसांपूर्वी याच कारणाने ग्रामस्थांनी चक्क डॉक्टरांच्या रिकाम्या खुर्चीलाच पुष्पहार अर्पण केला होता, कोट्यावधी रुपये जर या आरोग्य केंद्रासाठी खर्च केले असून हीच परिस्थिती असेल तर सर्वसामान्य माणसानी उपचारासाठी जायचे कुठे हाच प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान या रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टरांची नेमणूक करावी व या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी हीच मागणी आता मुलीच्या कुटुंबियांकडून होत आहे डॉक्टर असते तर आमची मुलगी वाचली असती. या प्रकरणी चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी या मातेच्या आईने केली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी घोलप यांनी कारवाडी येथे भेट देऊन डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी व कुटुंबीयांचा जबाब घेतला आहे. आता अहवाल काय येणार याची प्रतीक्षा आहे. दोषींवर कारवाई होईल मात्र, छोट्या बालिकेला तिची आई मात्र पुन्हा मिळणार नाही.


