


जेऊर कुंभारी वार्ताहर
जेऊरकुंभारी येथे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सर्वसामान्यांची कामे एकाच ठिकाणी होण्यासाठी उपयोगी ठरत आहे. जेऊर कुंभारी येथे संपन्न झालेल्या शिबिरातून अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. दि.३१ मे रोजी सुरु झालेले शिबिर दि.१ जून पर्यंत सुरू राहणार आहे. या शिबिरात जनसामान्यांना लाभ मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या जाणार असल्याचे सरपंच सुवर्णा पवार यांनी सांगितले. जेऊर कुंभारी ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या योजनेच्या शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच सुवर्ण पवार,महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते ,संचालक सतिशराव आव्हाड, माजी सभापती शिवाजी वक्ते ,गौतम बाॅकचे संचालक बापुराव वक्ते,कर्णासाहेब वक्ते, पाटीलबा वक्ते कल्याण गुरसळ, महेंद्र वक्ते, माजी सरपंच यशवंतराव आव्हाड, किशोर वक्ते, पोलिस पाटील बाळासाहेब गायकवाड ,
ग्रामविकास अधिकारी के.बी रणछोड, कामगार तलाठी ठेंगडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत खोत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अपर्णा आगवन आरोग्य सहाय्यक महाजन एस व्ही, कृषी सहाय्यक अधिकारी श्रीमती निर्मला सोनवणे रेशन दुकानदार राजू होन ,कोतवाल विजय लकारे, पशुधन पर्यवेक्षक कदम जे वाए, आरोग्य सेवक धांद्रे व्ही. डी. आशा सेविका कविता गायकवाड, मंगल पठारे अनिता मोहिते,आदी उपस्थित होते. या शिबिरात रमाई आवास योजना, नाव कमी करणे, जीर्ण झालेले रेशनकार्ड बदलून देणे, संजय गांधी निराधार अनुदान लाभार्थी यांना सेवा, राज्य निवृत्ती वेतन योजना, वीज कनेक्शन अर्ज स्वीकृती, वीज बिल दुरुस्ती, कोविड लसीकरण, नवीन मतदार नोंदणी करणे, जात प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, जन्म मृत्यू नोंदणी, अर्ज स्वीकृती करणे, नवीन रेशनकार्ड काढणे, श्रावणबाळ योजना, घरकुल अर्ज स्विकृती करणे आदी संदर्भात मोहीम राबवण्यात आलेली होती. या महसूल आपल्या दारी या उपक्रमाने सर्वसामान्य जनतेची मोठी गैरसोय दूर झाली असून कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्य जनतेला कोपरगाव येथे तहसीलदार कार्यालयात जावे लागत होते मात्र हा उपक्रम राबवल्यामुळे सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम केले असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या वेळी नाना गुरसळ, आनंद बारसे, संगीत वक्ते, शिवा वक्ते, प्रितम गायकवाड, राणा वक्ते, अथर्व गिरमे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


