
कोपरगाव प्रतिनिधी
महान समाजसुधारक ज्योतीराव फुले यांना रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे व रावबहादुर विठ्ठल कृष्णाजी वंडेकर यांच्या हस्ते मुंबईतील मांडवी कोळीवाडा येथे तमाम जनतेच्या वतीने ११ मे १८८८ रोजी ‘महात्मा’ या पदवीने गौरविण्यात आले. तेव्हापासून जोतीराव फुले हे महात्मा फुले नावाने परिचित झाले. म्हणून ११ मे हा दिवस ‘महात्मा दिन’ कोपरगाव येथील धोत्रे गावात श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाचे
उत्तर जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कोपरगाव तालुकाध्यक्ष अशोक माळवदे प्रास्ताविक करताना म्हणाले की, समाजसुधारक ज्योतीराव फुले यांना रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे व रावबहादुर विठ्ठल कृष्णाजी वांडेकर यांच्या हस्ते मुंबईतील मांडवी कोळीवाडा येथे तमाम जनतेच्या वतीने ११ मे १८८८ रोजी ‘महात्मा’ या पदवीने गौरविण्यात आले. तेव्हापासून जोतीराव फुले हे महात्मा फुले नावाने परिचित झाले. म्हणून ११ मे हा दिवस ‘महात्मा दिन’ म्हणून देशभरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करतात.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाचे अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे बोलताना म्हणाले की, महात्मा फुले यांचे कार्य संपूर्ण जगाला सर्वश्रुत आहे.’शेतकऱ्यांचा असूड “हा त्यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ .इसवी सन १८४८ पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे वाड्यात त्यांनी पाहिली शाळा सुरू केली.तसेच त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा उभारल्या .विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीतीविना गती गेली, गती विना वीत्त गेले, वित्तविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्याने केला. समाजाला विद्येचे दान देणाऱ्या या महामानवास कोटी कोटी प्रणाम. स्त्री-शुद्र-अतीशुद्र समाजाच्या उन्नतीसाठी सावित्रीबाई फुले व ज्योतीबा फुले ज्या तन्मयतेने झटत होते, त्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले होते त्या आपल्या उद्धारकर्त्या महामानवाचे ऋण फेडण्यासाठी गरीब व कष्टकरी जनतेने मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे जमून जोतीबा फुलेंना युगप्रवर्तक कार्याबद्दल महात्मा पदवीने गौरविले होते त्या घटनेस ११ मे २०२३ रोजी १३५ वर्षे पुर्ण होत आहेत. या घटनेचा वेध घेऊन श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेने देशभर सलग आठ वर्ष विविध उपक्रम घेऊन हा विशेष दिन साजरा केला असून यावर्षी देखील ‘महात्मा दिन’ उत्साहात साजरा केला असल्याचे मुकुंद काळे म्हणाले.
संघांचे कार्यअध्यक्ष डाॅ.मनोज भुजबळ या प्रसंगी बोलताना म्हणाले की, माळी समाजात उत्तम काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत.त्यात सचिनजी भाऊसाहेब गुलदगड संस्थापक अध्यक्ष श्री संत सावता माळी युवक संघ राज्य उल्लेख करावा लागेल,प्रामुख्याने ग्रामीण भागातील युवा पिढीचे संघटन करून राज्यभर विविध उपक्रम राबविणे आणि प्रबोनात्मक कार्ये करत आहेत प्रथम त्यांनी श्रीसंत सावता महाराज संजीवनी समाधी स्थळी सावता ज्योती चा उत्तम उपक्रम राबविला.त्यानंतर विविध मेळावे,रक्तदान शिबिरे,जयंती,उत्सव साजरे केलेत त्यात सलग आठ वर्षे महात्मा दिन उपक्रम करून राज्यात महात्मा फुले यांचे कार्ये भावी पिढी पर्यंत पोचविण्याचे उत्तम कार्य करत आहेत.त्या सर्व टिमचे माळी समाज प्रबोधिनी महाराष्ट्र व सावित्रीच्या लेकींच्या वतीने अभिनंदन केले.
या वेळी संतोष रांधव, संदीप डोखे, अनंत वाकचौरे, अमोल माळवदे,शेखर बोरावके,मनोज चोपडे,ओकांर वढणे,सामाजिक कार्यकर्ते सतिशराव शेटे,सुर्यभान घाटे,ग्रामपंचायत सदस्य प्रदीपजी चव्हाण,पोलीस पाटील देवेश माळवदे,संदीप भाटे,हेलोडे मामा,नितीन रोकडे,भारत चव्हाण,नारायण पोटे,सुमनबाई शिंदे ग्रामपंचायत शिपाई,सागर शिंदे,राजेंद्र माळवदे,व धोत्रे ग्रामस्थ उपस्थित होते. योगेश ससाणे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.


