
जेऊर कुंभारी वार्ताहर
मौजे जेऊर कुंभारी ता कोपरगाव येथील गोदावरी नदीपात्रातुन मोठया प्रमाणावर अवैध वाळु उपसा सुरू आहे.त्यामुळे येथील शेतकरी वर्ग व गावातील नागरीक खुप त्रस्त झाले आहे. सदरच्या वाळु उपसा मुळे गोदावरी नदी पात्रा लगतच्या शेतकऱ्यांना शेतात जाऊन मशागत करणे, पिक काढणे साठीचे रस्ते ही ठेवले नाही सदरचे रस्त्या खालील वाळु उपसा करून नेल्यामुळे नदी काठच्या शेतकऱ्यांना शेती करणे खुप अडचणीचे झाले आहे. त्याच बरोबर नदी पात्रात जेऊर कुंभारी गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची विहीर आहे परंतु तिच्या आजूबाजुला मोठा वाळू उपसा होत आहे तसेच अनेक शेतकऱ्यांच्या नदी पात्रात विहीरी असुन त्या नजीकचा वाळू उपमा करून मोठी खड़ड़े केलेली त्यामुळे त्या विहाराचे बांधकाम तुटुन जाऊन विहिरी बुजुन जात आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. या संदर्भात या शेतकऱ्यांनी अनेक वेळा जवळच्या तालुका कार्यालयात जाऊन तक्रारी अर्ज केले आहे परंतु वैयक्तिक फायद्यासाठी सदर कार्यालयाकडुन कोणतीही कारवाई झाली नाही असे नागरीकांमधुन बोलले जात आहे.जर हा प्रश्न असाच प्रलंबित राहीला तर नदी काठचे शेतकऱ्यांच्या जमिनी नदीपात्र झाले शिवाय राहाणार नाही. तरी आपण वरील विषयावर शासकिय पातळीवर नजीकच्या कार्यालयांना योग्य ते आदेश देऊन सदरचा बालु उपसा बंद करून योग्य ती कारवाई करावी.
अश्या मागणीचे निवेदन सोमवार दि.८ मे रोजी जेऊर कुंभारी ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने मा.पोलीस निरीक्षक कोपरगाव पोलिस ठाणे यांना देण्यात आले
यावेळी माजी सभापती शिवाजी वक्ते, माजी संचालक मधुकर वक्ते, माजी सरपंच विठ्ठलराव आव्हाड, माजी सरपंच कैलासराव वक्ते ,उपसरपंच ताराचंद लकारे, ग्रामपंचायत सदस्य यशवंतराव आव्हाड, प्रदीप गायकवाड, संजय वक्ते, भाऊसाहेब वक्ते, तुषार गुरसळ,बाळासाहेब जाधव,करणा वक्ते उपस्थित होते.


