
जेऊर कुंभारी वार्ताहर
तथागत गौतम बुद्धांनी दया,करुणा यांचा उपदेश देताना दुःखावर मात करून आनंदी जीवन कसे जगावे हे शिकविले. बुद्धांनी संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश दिला. खऱ्या अर्थानं समता आणि अहिंसा यांचे तत्वज्ञान सांगणारे गौतम बुद्ध अभ्यासण्याची आज गरज आहे. मानवी जीवन समृद्ध बनवण्यासाठी बुद्धांच्या उपदेशाचे अनुसरण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करतांना आर पी आय चे राज्य सचिव तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष दिपकराव गायकवाड यांनी उपस्थितांना बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.जेऊर कुंभारी संजयनगर येथील आर पी आय शाखा व भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळ यांचे वतीने बौद्ध पौर्णिमा निमित्त आयोजीत सामुहीक वंदना व खीरदान कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.
वैशाखी पौर्णिमेला तथागत बुद्धांचा जन्म झाल्याने हा दिवस बौद्ध अनुयायी मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात त्यामुळे जेऊर कुंभारी संजयनगर येथे आरपीआय शाखा व भीमसाम्राज्य सेना मित्रमंडळाचे वतीने सायंकाळी सात वाजता सामूहिक वंदना व खीरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी नाना मोहिते यांचे हस्ते डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून निलेश शिंदे यांनी सपत्निक मेणबत्ती प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सामूहिक वंदना पार पडले नंतर खीरदानाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुरावजी काकडे,संजय भालेराव, किसन गायकवाड, दामू अण्णा गायकवाड, किरण गायकवाड,बाळासाहेब पगारे, सोपान खरात बाळासाहेब इंगळे, नामदेव गायकवाड,राहुल गायकवाड, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सुधाकर वक्ते,शिवसूत्र युवा प्रतिष्ठान अध्यक्ष विशाल गुरसळ, चिमाजी वायकर, कोंडीराम काकडे, बाबुराव पवार, किरण खांडेकर,अमोल जगताप भीमा साळवे, संतोष बोरावके यांचे सह शेकडो महिला- पुरुष अनुयायी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीम साम्राज्य सेना मित्र मंडळाचे अध्यक्ष सागर गायकवाड कार्याध्यक्ष सुमित पगारे सदस्य सचिन गायकवाड, सुरेश चव्हाण, अजय गोरसे, पप्पू गायकवाड, महेश गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले तर खीर बनवण्यासाठी मंगल ताई आव्हाड यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य तसेच भीम साम्राज्य सेना मित्र मंडळाचे संस्थापक प्रदीप अण्णा गायकवाड तर आभार उपाध्यक्ष दावीद भाऊ धीवर यांनी व्यक्त केले.


