
जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जेऊरकुंभारी गावातील आप्पासाहेब वक्ते यांच्या सर्वे नंबर ८२/२ शेतातून समृद्धी महामार्ग गेला आहे व समृद्धीच्या कडेला कंपाऊंड करण्याचे काम चालू आहे त्याच्या शेजारी विद्युत पोल कंपाऊंडला अडथळा निर्माण होत असल्याने समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी विद्युत पोलचा ताण (आधार ) काढला मात्र तो काढू नये तसेच त्याला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी असे आप्पासाहेब वक्ते यांनी समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सांगीतले होते तरी देखील अधिकाऱ्यांनी याकडे कानडोळा केला. त्याचा विपरीत परिणाम म्हणुन कालच्या पावसाने व वादळी वाऱ्याने तो विद्युत पोल पडला त्यामुळे जेऊर कुंभारी गावातील काही भागात लोकांना अंधारात रात्र काढावी लागली.सकाळी आप्पासाहेब वक्ते यांनी आपल्या शेतात गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, विद्युत पोलाचा ताण काढल्यामुळे तो पोल वादळी वाऱ्याने तुटला गेला त्यांनी कोणत्या क्षणाचा विलंब न करता ही गोष्ट समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सांगितले व ती तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावी असे सांगितले मात्र दोन दिवस उलटूनही गेले मात्र समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्याने याकडे ढुंकूनही पाहिले नाही. महावितरण अधिकाऱ्यांचे सुद्धा याकडे लक्ष गेले नाही हे जर असेच चालले तर शेतकऱ्यांनी शेती कशी करायची? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आपले शेत फुलवले आहे तसेच कालव्याला पाणी नाही. शेतकऱ्यांनी कमी पाण्यात तुषार व ठिबक सिंचनाच्या साह्याने आपले शेत फुलवले आहे, त्यात विजेचे लपंडाव व काही भागात विद्युत रोहित्रे बंद करण्याची मोहीम जोरात चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती कशी करायची असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर भेडसावत आहे महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नये तसेच आज समुद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर कोणाचा वचक राहिलेला नाही अशी खंत आप्पासाहेब वक्ते यांनी व्यक्त केले.


