Thursday, April 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedबिबट्याच्या हल्ल्यात पाच बकऱ्या मृत्युमुखी देर्डे कोऱ्हाळे येथील घटना!!

बिबट्याच्या हल्ल्यात पाच बकऱ्या मृत्युमुखी देर्डे कोऱ्हाळे येथील घटना!!

कोपरगाव प्रतिनिधी :

गेल्या काही महिन्यापासून कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, जेऊर कुंभारी, मुर्शतपुर आदी करून गावांमध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त काही होईना असा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात अनेक पाळीव जनावरे शेळ्या बकऱ्या लहान लहान वासरे मृत्युमुखी पडून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे तसेच जीवाला पण भीती निर्माण झाली आहे. शेळ्या बकऱ्या कुत्रे इत्यादी प्राण्यांना बिबट्या आपले भक्ष्य करून मारून खात असल्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
दि ०६ मार्च २०२३ रोजी पहाटे देर्डे कोऱ्हाळे येथील शेतकरी कचेश्वर पांडुरंग सावंत यांच्या ०६ व गणेश सुभाष काळे यांच्या ०२ बकऱ्या व एक शेळी यांच्यावर बिबट्यानाने हल्ला केला यातील ०५ बकऱ्या मेल्या व तीन बकऱ्या व एक शेळी जखमी केल्या
वाड्या वस्त्यांवर बिबट्यांचा अशा प्रकारे प्राण्यांवर होणारा हल्ला आता गावात भर वस्तीवर व्हायला लागला ही अतिशय चिंतेची बाब असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त वेळीच करणे गरजेचे असल्याचे मत येथील सरपंच नंदा माळी व उपसरपंच आशा डुबे यांनी व्यक्त केले आहे.
रोज वर्तमानपत्रांमध्ये कोठे न कोठे बिबट्याने हल्ला केल्याच्या बातम्या छापून येतात बिबट्या प्राण्यांना आपले भक्ष करत आहे त्यामुळे शेतकरी रानावनात रात्रीचे शेतीला पाणी देण्यासाठी जाताना अतिशय धास्तावला आहे. तरी देखील वनविभाग याकडे गांभीर्याने बघत नाही अनेक वेळा दूरध्वनी करून प्रत्यक्ष कार्यालयात भेटी देऊन सांगून तक्रारी करून देखील वन विभागाचे अधिकारी थातूरमातूर उत्तर देऊन नागरिकांना एक प्रकारे विठीस धरत आहे.
एकीकडे विजेचे वेळापत्रक कधी दिवसाचे तर कधी रात्रीचे असल्यामुळे रात्री अपरात्री शेतात जाण्याची शेतकऱ्यांना गरज असते आता रब्बी हंगामातील गहू हरबारा कांदा मका ही पिके जोमात असल्यामुळे आणि उन्हाचा चटका वाढू लागल्यामुळे पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली असली तरी पण जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना शेतात जाणे भाग पडते आणि अशातच बिबट्याची दहशत वाढल्यामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करुन ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील देर्डे कोऱ्हाळे चे सरपंच उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते त्र्यंबक शिंदे आदी सह नागरीकांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!