Monday, April 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedपोहेगाव वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सोनेवाडी ग्रामस्थांचा घेराव !!

पोहेगाव वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सोनेवाडी ग्रामस्थांचा घेराव !!

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव नगद वाडी सोनेवाडी देर्डे आदीसह गावातील शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने विज बिल भरा अन्यथा विद्युत पुरवठा खंडित केला जाईल अशा पद्धतीचे फर्मान सोडल्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी जर्जर झाल्याची भावना या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे
शेतकऱ्यांनी आपली थकलेल्या बिलातील रक्कम तसेच  महावितरण कंपनीने ठरवुन दिलेली रक्कम भरणे बंधनकारक असुन तसे न झाल्यास त्यांचा विजपुरवठा खंडीत केला जाणार असल्याचा फतवा महावितरण कंपनीने काढला असुन त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे या पार्श्वभूमीवर काही तोडगा काढता येइल का यासाठी सोनेवाडी येथील सरपंच निरंजन गुडघे उपसरपंच संजय गुडघे, पोलीस पाटील दगू गुडघे शिवदास जावळे पुंजाभाऊ जावळे निरंजन जावळे संतोष गुडघे अण्णासाहेब कांदळकर शिवाजी गुडघे संदीप गुडघे किशोर जावळे आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महावितरणचे कनिष्ठ अभियंता सोमनाथ निरगुडे यांच्यापुढे ग्रामस्थांनी आपले गाऱ्हाणे मांडले.
कोर्टाचा आदेश आहे विधानसभेमध्ये देखील याबाबत प्रश्न उपस्थित झालेले आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहेत असे असताना देखील महावितरणचे अधिकारी कर्मचारी वीज बिले भरण्यासाठी सक्ती करत असून फोन करून रुपये ५००० चे एक रकमी वीज देयक देऊन विज बिल भरण्याविषयी सक्ती करत आहेत फक्त चार तास आम्हाला वीज पुरवठा होतो तो देखील पूर्ण दाबाने होत नाही अशी परिस्थिती असताना व मुख्यमंत्री आणि कोर्टाचे आदेश असताना वीज वितरण कंपनी विज बिल वसुलीची सक्ती का करत आहे असा संतप्त सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे. कॅनॉल ला पाणी आल्यानंतर २५ ते ३० डीपी एका वेळेस बंद केले जातात तसेच कोऱ्हाळे फिडर हे नेहमीच ओव्हरलोड असते गेल्या वीस वर्षापासून ही समस्या आम्ही महावितरण ला वेळोवेळी निवेदने देऊन विनंती करून सांगितलेली आहे परंतु आजवर त्यावर कुठलाही तोडगा महावितरण कडून निघालेला नाही  महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना पूर्वकल्पना न देता वीज तोडणी करून शेतकऱ्यांवर अन्याय करू नये. सध्या रब्बीचा हंगाम चालू असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गहू कांदा लागवड केली आहे. पिके आता थोड्याच दिवसात काढणीला येणार आहेत तेव्हा महावितरण कंपनीला विद्युत पुरवठा खंडन करण्याविषयी कुठलीही आदेश नसताना शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. असे यावेळी आलेल्या शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. गेल्या दोन वर्षापासून कोपरगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यात शासनाची मदत अजूनही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा झालेली नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पूसले आहे शेतकऱ्यांनी कर्ज काढून रब्बी पिकांची लागवड केली.
नगदवाडी सोनेवाडी सह गावात पूर्ण बिल न भरल्याने महावितरण विभागाने शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता वीज रोहित्राचा पुरवठा खंडित करू नये. शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. हे वेळीच थांबले जावे नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सोनेवाडी येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सोनेवाडी नगद वाडी येथील ग्रामस्थांनी वीजपुरवठा खंडित करू नये म्हणून घेराव घातला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!