

कोपरगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान मुंबई नागपुर संमृध्दी महामार्गासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना भेटीचे निमंत्रण दिले या दरम्यान झालेल्या बैठकीस चांदेकसारे येथील शेतकरी सागर होन हे उपस्थित होते.
नागपुरात पार पडलेल्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला शेतकऱ्यांना मोबदला व्यवस्थित मिळाला की नाही,त्या पैशाचा विनियोग योग्य पध्दती झाला कि? शेतकऱ्यांनी मिळालेल्या पैशातुन आपल्या व कुटुंबाच्या भविष्यासाठी कशी गुंतवणुक केली याबाबत माहिती घेत त्यांची आस्थेने विचारपुस केली.
या भेटीदरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने महामार्गाच्या कामातील निर्दशनास आलेल्या उणीवा व त्यापासुन येणाऱ्या अडचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगीतल्या,
शासनाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकरी वर्ग ३मध्ये प्राधान्य मिळावे यासाठी प्रकल्पग्रस्त असल्याचे सर्टीफिकेट मिळावे अशी मागणी या वेळी करण्यात आली
चांदेकसारे येथील शेतकरी सागर होन यांनी जेऊर कुंभारी, चांदेकसारे
डाऊच खुर्द, डाऊच बुद्रुक, घारी पोहेगाव येथील गाव रस्त्यांसाठी काढलेल्या बोगद्यांची (डक) उंची कमी झाल्याने जड वाहतुकीच्या साधनांना ये जा करताना येणाऱ्या अडचणी,बोगद्यात साचणारे पाणी यामुळे पादचारी यांना होणारा त्रास महामार्गाच्या भराव्यावरील पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही उपाययोजना न केल्याने व पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने पिकांचे होणारे नुकसान तसेच या भागातील शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम सुरू असताना तुटलेल्या पाईपलाईन जोडण्याबाबत समुद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी केलेली विनंती मात्र अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष या सर्व बाबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातल्या.


