Saturday, April 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंजय राऊत यांना जामीन मंजूर कोपरगावात शिवसेनेच्या वतिने जल्लोष साजरा!!

संजय राऊत यांना जामीन मंजूर कोपरगावात शिवसेनेच्या वतिने जल्लोष साजरा!!

कोपरगाव प्रतिनिधी

गेल्या १०२ दिवसापासून पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राऊत जेल मध्ये होते.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवसेनेचा वाघ संजय राऊत यांना नुकताच जामिन मंजूर झाला.राऊत यांना जामिन मंजूर झाल्यामुळे .शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरात शिवसेनेच्या वतिने फटाके वाजवत पेढे भरवून आंनद उत्सव साजरा करण्यात आला आहे.शहरातील मेन रोड वर डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ फटाके फोडून आतिषबाजी करत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येच्या उपस्थितित हा आनंद साजरा केला आहे.शिवसैनिकांनी दिवाळीच साजरी केली आहे.जय भवानी जय शिवाजी,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,उध्दवसाहेब ठाकरे, आदित्य साहेब ठाकरे,राऊत साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या प्रसंगी कलविंदरसिंग दडियाल म्हणाले की,सत्य परेशान हो सकता है,परंतु पराजित नही हो सकता, १०२ दिवसानंतर शिवसेनेचा हिरा शिवसेनेचा वाघ,सामनावीर रोखठोक भुमिका मांडणारे संजय राऊत साहेब यांची न्यायालयाने जामिन मंजुर करुन सुटका केली आहे.आता सामना होणार रोखठोक ठोकणार, न्यायलयाने स्पष्ट सांगितले की,राऊत यांच्यावर चुकीचे दोषारोप लावले आहे.त्यांना चुकीच्या पध्दतीने अटक करण्यात आली आहे.त्यांना १०२ दिवसानंतर न्यायालयाने जामिन दिला आहे.आता गद्दारांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेचे वाघ खासदार राऊत साहेब पुन्हा ताकदीने लढणार आहे.या प्रकरणावर न्यायलयाने ताशेरे ओढले आहे.त्यामुळे इडी सरकारने आता तरी सुधरावा,न्यायालयाच्या या निर्णयामुळे आम्हाला न्याय मिळाला आहे.गद्दारांना आम्ही त्यांची जागा दाखवून देवु,राऊत साहेबांवर टीका करण्यार्यांना ही मोठी चपराक बसली आहे.ह्या ईडी सरकारने १०२ दिवस कटकारस्थान करुन त्यांना जेल मध्ये डांबविण्यात आले होते.परंतु न्यायलयाने न्याय दिला आहे.अंधेरीतुन पेटलेली मशाल प्रत्येक गावागावात आता पोहचिणार आहोत.राहुल देशपांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की,मोडल पण वाकणार नाही या म्हणी प्रमाणे राऊत साहेब इडी सरकार पुढे झुकले नाही.हे जे सरकार आहे ,हे इडी सीबीआय यांचा गैरवापर करण्यासाठी हे सरकार बनवल आहे.वाघ आता बाहेर आला आहे.गद्दारांचे ५० खोके. बाहेर काढणार आहे.या प्रसंगी कलविंदरसिंग दडियाल,इरफान शेख,विशाल झावरे,राहुल देशपांडे,बाळासाहेब साळुंके,विक्रांत झावरे,योगेश उशिर,विकास शर्मा प्रफुल्ल शिंगाडे,जाफर पठाण,मधूकर पवार,वसिम शेख,आकाश कर्डिले,अशोक पवार, उमेश छुगाणी,रोशन पवार,साहील परसैय्या,दिपक दळे,संतोष झावरे,विशाल सदर,प्रवीण शिंदे,अरुण बोराटे,सतिष शिंगाणे यांच्या सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!