Saturday, April 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedजेऊर कुंभारी गावात मंजूर झालेली विकास कामे का रखडली!!

जेऊर कुंभारी गावात मंजूर झालेली विकास कामे का रखडली!!

जी झाली तिही निकृष्ट दर्जाची !!- सामाजिक कार्यकर्ते विशाल गुरसळ

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावात गिरमे वस्ती शाळा दुरुस्ती, गावठाण शाळा ,हरिसन ब्राॅच शाळा, रस्त्यांची दुरुस्ती शौचालय असे विकासाची मंजूर झालेले कामे का थांबवली जात आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्ता विशाल गुरसळ यांनी विचारला आहे.
या अगोदर गावठाण शाळा दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले तेव्हा ग्रामस्थांनी एकत्र येत ते काम बंद पाडले या दुरुस्तीमध्ये शाळेच्या छ्तासाठी वापरला जाणारा पत्रा इस्टिमेट मध्ये जर ६३ एमएम वापराव असे नमुद असताना तो ४५ एम एम चा कसा वापरण्यात आला त्यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाच्या डोळ्यावर भात बांधला होता का? शेवटी ग्रामस्थांनी हे काम बंद पाडलं
हे काम बंद करून पाच महिने उलटून गेली तरीही शाळेला नवीन पत्रे टाकण्यात आली नाही तसेच शाळेला फरशी,फ्लेवर ब्लॉक बसवणे, नवीन शौचालय निर्माण करणे, ही कामे मंजूर झाली असताना ती का केली जात नाही ? ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक विकास कामे होऊ द्यायची कि त्यात काही गौडबंगाल आहे असही ग्रामस्थां मध्ये चर्चा सुरु आहे.
गावठाण शाळेला फरशी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना वाळूवर बसून अध्ययन करावे लागत आहे काही दिवसापूर्वी जेऊर कुंभारी गिरमे वस्ती शाळेत साप आढळलेला असल्याने शाळेची दुरुस्ती करण्यात यावी यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाला सांगण्यात आले व ते काम मंजुर झालेले आहेत पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात नाही असे का होत आहे असा सवाल सर्वसामान्य जनता विचारत आहे जेऊर कुंभारी गावात या तिन्ही शाळेमध्ये गोरगरिबांची मुले शिकत आहे त्यांना भौतिक सुविधा मिळणे गरजेचे आहे पण त्यांना त्या मिळत नाही यावरून असे लक्षात येते की ग्रामपंचायतला प्रशासनाला
विकासाशी काही घेणे देणे राहिले नाही अपघाती जर विद्यार्थ्यांच्या जिवाला काही झाले तर याला जबाबदार कोण आहे तरी ग्रामपंचायत प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणं थांबवावे असा विनंती वजा इशारा विशाल गुरसळ यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले की आपण २१व्या शतकात वावरत आहोत गावची लोकसंख्या लक्षात घेता स्मशानभूमी सुसज्ज असावी नागरिकांना अंत्यविधीसाठी सुविधा उपलब्ध झाल्या पाहीजे लाईटची व्यवस्था नसेल तर यांच्या इतके दूर्रभाग्य कोणते शासन जर निधी देत असेल तर तो अंमलात का आणला जात नाही प्रत्यक्षात कामे का चालू होत नाही जेऊर कुंभारी ग्रामपंचायत प्रशासनाला मंजूर झालेली विकास कामे करायची नाही का असा सवाल समाजीक कार्यकर्ते विशाल गुरसळ यांनी विचारलेला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!