

कोपरगाव प्रतिनिधी
जेऊर कुंभारी स्मशानभूमीत लाईटची कायमस्वरूपी सोय नसल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरीकांची गैरसोय होत असुन त्यांनाअनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अंत्ययात्रा स्मशानभूमीत आल्यानंतर ग्रामस्थ कर्मचाऱ्याला फोन करतात त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाला जाग येते रात्री अपरात्री कर्मचारी जीव मुठीत धरून खांबावर आकडे टाकून अंत्यविधीसाठी दिवे लावतात यात काही अपघात झाल्या स याला जबाबदार कोण अशी विचारणा जेऊर कुंभारी ग्रामस्थ यांनी केली आहे .
काही दिवसांपूर्वी स्मशानभूमीची दुरूस्ती व्हावी यासाठी नागरिकांना अनेकदा पाठपुरावा करावा लागला त्यानंतर मिडीयात बातम्या प्रसिद्ध झाल्या नंतर ग्रामपंचायतीने पिंजऱ्याची तात्पुरती डागडुजी करून ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसली काल रात्री तर हद्दच झाली अंतयात्रा स्मशानभूमीत पोहचली तरी ग्रामपंचायत अंधारातच होती ग्रामस्थांनी फोन केल्यानंतर कर्मचारी खडबडुन जागे झाले व धावपळ करत येऊन विजेच्या खांबावर आकडा टाकुन स्मशानभूमीत दिवा लावले कायम असेच चालत राहीले तर गावाचा विकास कधी होणार असे प्रश्न सर्व सामान्य जनता विचारत आहे? जर ग्रामपंचायत कर्मचारी यांना दिवे लावण्यासाठी
जीव मुठीत धरून आकडा टाकावा लागतो तर यासारखे दुर्रभाग्य नाही तरी ग्रामपंचायतीने स्मशानभूमीत सुरक्षित तसेच कायमस्वरुपी लाइटची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


