

“एक दिवस मैत्रीसाठी “
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील भारत सर्व सेवा संघ संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे "अगत्य कृषी पर्यटन स्थळ सावळीविहीर" येथे दिपावली चे औचित्य साधुन सन.२००६-२००७ शैक्षणिक वर्षातील १०वीच्या माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला.

या प्रसंगी श्री गोसावी सर, श्री होन सर, श्री जावळे, श्री पाटील सर, श्री पवार सर, श्री बर्डे सर आदी शिक्षक वूंद उपस्थित होते कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी तब्बल १६ वर्षानंतर सर्व एकत्र आल्यामुळे सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी च्या चेहर्यावर वेगळाच आनंद दिसत होता,चांदेकसारे च्या विद्यालयातील सर्वात मोठी बॅच हीच होती हे देखील उपस्थित शिक्षकांनी मान्य केले. सर्व शिक्षकांचा सत्कार यावेळी माजी विद्यार्थ्यांनी केला. चांदेकसारे स्कूल च्या जुन्या आठवणी यावेळी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यानीं सांगितल्या. यावेळी श्री गोसावी सर यांनी ते शिकवत असणाऱ्या इतिहास विषयांवर काही किस्से या वेळी सांगितले, या वेळी सर्व विदयार्थी व शिक्षक खळखळून हसले, त्या नंतर श्री व्ही टी होन सर यांनी सांगितले की शिक्षकांसाठी विद्यार्थी हा कायमच विद्यार्थी असतो तो शिक्षका पेक्षा मोठा कर्तृत्वाने होतो तेव्हा शिक्षकानां आपले सार्थक झाल्याची जाणिव होते, त्यानंतर श्री पाटील सरांनी या वेळी स्कूल ची सध्या ची परिस्थिती व २००६ च्या काही आठवणी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या,ते पुढे म्हणाले की आज १६ वर्षानंतर तुम्ही या ठिकाणी एकत्र आले असेच दरवर्षी यावे व तुमची १२८ विद्यार्थी एकत्र राहून आपल्या वर्ग मित्रांना अडचणी च्या काळात मदतीचा हात द्या म्हणजे तुमची मैत्री व एेकी कायम राहील,या नंतर श्री पवार सर व बर्डे सर यांनी देखील आपल्या मनोगतात जुन्या आठवणी ना उजाळा दिला,.त्याच बरोबर नवनवीन कल्पना करत नविन शैक्षणिक धोरण स्विकारत शिक्षकांनी उत्कृष्ट विद्यार्थी घडवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
२००६-२००७ बॅचच्या माजी विद्यार्थींनी तसेच आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी श्री वैभव अंबिलवादे,श्री अमोल जाधव,श्री विजय माकोणे,श्री ऋषीकेश होन, श्री विकास माकोणे, श्री राहुल होन,श्री सागर होन,सौ सिमा होन-जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आपल्या आठवणी मधील विद्यालयातील घडलेले किस्से सांगितले,यावेळी करोनाच्या काळात जे सोडून गेले त्याच्या करीता श्रध्दांजली वाहण्यात आली, तसेच १२८ विद्यार्थ्यांपैकी ३ माजी विद्यार्थी हयात नसल्याने याची उणिव या ठिकाणी होत असल्याचे या वेळी सांगितले,श्री वैभव अंबिलवादे यांनी आपल्या सुमधुर स्वरात मैत्री वर कविता सादर करून सर्वानांच भावनीक करून टाकले, तब्बल १६ वर्षानंतर आपले सर्व जुने मित्र – मैत्रिण भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

,या वेळी माजी विद्यार्थी, ,पंचक्रोशीतील शिक्षणप्रेंमी ग्रामस्थ,महिला,विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चित्तरंजन मोकळ व श्री जालिंदर पुंगळ यांनी तर आभार श्री राहूल होन यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल खरात, मच्छिंद्र खरे, दगु अल्हाट, राहूल होन यांसह सर्व माजी विद्यार्थांनी परीश्नम घेतले.
व यावेळी रवींद्र होन,महेश होन, प्रदीप होन,सुधीर चव्हाण, अर्जुन बोरावके,पांडुरंग गुरसळ, दिपक रोकडे, राजु पठाण, अविनाश जोशी, यमराज जाधव, अमोल जाधव,फिरोज शेख, किशोर पवार, सुनिल पवार,किरण होन, योगेश शिरसाठ,कुणाल गुरसळ, मधुकर होन, दत्तात्रय शिंदे, प्रकाश आहेर, किसन गायकवाड,सुनिल जगताप, विलास होन, धिरज होन, सचिन होन, प्रसाद सोनवणे, प्रकाश दहे, गौतम दहे, तात्याबा दहे, शुक्लेश्वर बढे, सागर गुरसळ, सागर दहे, त्याचबरोबर सिमा होन-जाधव, रोशनी रोकडे,योगिता होन- पवार,माधुरी होन, रविना गुरसळ, अनिता खरात, कल्पना होन आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते


