Monday, April 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedजेऊर कुंभारी सोसायटीची निवडणूक एक आदर्श !! -शशिकांत वक्ते

जेऊर कुंभारी सोसायटीची निवडणूक एक आदर्श !! -शशिकांत वक्ते

कोपरगाव प्रतिनिधी

नुकतीच काल पार पडलेली जे.कुंभारी सोसायटी निवडणूक एक आदर्शच सर्व प्रथम सर्व विजयी उमेदवारांचे मनापासून अभिनंदन. एक युवक म्हणून मी तर म्हणेल जी निवडणूक काल पार पडली ती एक आमच्यासाठी व जे. कुंभारी गावासाठी एक आदर्शच आहे कारण कोल्हे गट आणि काळे गट या दोन्ही गटांनी ज्या शिस्तीत व ज्या नियमात ही निवडणक पार पाडली हा एक आदर्शच मानावा लागेल. आदर्शाची गोष्ट म्हणजे निवडणुक निकाल १३-० असा लागूनही जी शांतता व जो संयम दोन्ही गटांनी ठेवला तो खरोखर कौतुकास्पद आहे. त्यासाठी माझ्याकडून सर्वांना शंभर तोफांची सलामी देतो. अतिशय शांतता व शिष्टाचार पाळला गेला. गावाच्या शिस्तीला व शांततेला कोठेही गालबोट लागू दिले नाही हे विशेष. आम्ही युवक तर या पुढील गावातील सर्व निवडणुका या निवडणुक न घेता तडजोडीने व सामंजस्याने व्हाव्यात हीच अपेक्षा करतो. भविष्यातील गावातील नागरिकांनी व विशेषतः युवकांनी स्वतः च्या वैयक्तिक प्रगतीकडे लक्ष द्यावे. दोन्ही गटातील उमेदवारांनी तसेच नागरिकांनी मनात एकमेकांबद्दल कोणतीही शंकाकुशंका व वैयक्तिक द्वेष न मानता आपापले संबंध आबादित ठेवावे, कारण या निवडणुका कालहि होत होत्या, आजही होत आहेत आणि उद्या म्हणजे भविष्यातही होत राहतील. आपण असो वा नसो पण हा गावगाडा व हा निवडणुकीचा खेळ असाच अविरत चालू राहणार आहे पण ज्याला हा गावगाडा व निवडणुकीचा मृगजळ खेळ समजला तोच खरा ज्याचा त्याचा विजय. ज्याचे आचार विचार स्वच्छ त्याचे संपूर्ण जीवन स्वच्छ हाच नियतीचा नियम आहे. राजकारण व नाती (वैयक्तिक संबंध) या दोन्हींतून मला विचारले तर मी नाती संबंध निवडेल. जिरवा जिरवी चे राजकारण करू नका संपुन जाल. विजय पराजय या फक्त थोतट गोष्टी आहे. जय पराजय च्या भोवऱ्यात पडाल तर सबंध आयुष्य कोलमडून जाईल. एक खेळ खेळलो व तो तेथेच सोडून दिला हि भावना प्रत्येकाने मनामध्ये जपा वैयक्तिक द्वेष, वैर कोणीही मानू नका संबंध व आपापली नाती जपा, एक दिवस प्रत्येकाला येथून जायचेच आहे या मृगजळात फारसे विशेषतः युवकांनी अडकु नका, मी तर म्हणेल एक विनोद म्हणून गावचे राजकारण करा मनाला कोणीही लावून घेऊ नका हीच सर्व गावकऱ्यांना विनंती करतो. यापुढील गावातली निवडणुका ह्या तडजोडीने व सामंजस्याने व्हाव्यात या गोष्टीत विशेषतः गावातील श्रेष्ठींनी विशेष लक्ष घालावे हीच अपेक्षा करतो.

लेखक- श्री.शशिकांत रामभाऊ वक्ते
महारुद्रा फाऊंडेशन (अध्यक्ष)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!