
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी विविध सोसायटीच्या निवडणुकीमध्ये वीरभद्र
पॅनल चा पराभव करत शेतकरी पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे
ना.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखालील काळे गटाचा विरभद्र पॅनल व
अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधाऱ्यांचा शेतकरी विकास पॅनल यांच्यात चुरशीची लढत झाली यात कोल्हे गटाच्या शेतकरी विकास पॅनलने निवडणुकीत बाजी मारून १३पैकी १३ उमेदवार निवडून आणुन कोल्हे गटाने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले
या सोसायटीमधे ७०८ सभासद असुन ६४१ सभासदांनी मतदानचा हक्क बजावला
विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे .
गुरसळ परसराम पुंजाजी,चव्हाण आनंदा गोकुळ,चव्हाण दादासाहेब सखाहारी,जाधव अरविंद चिमाजी
पगारे तुळशीदास विठ्ठल,वक्ते कर्णासाहेब रामचंद्र,वक्ते कोंडीराम संपत ,शिंदे सोने बापू रावजी
देवकर बारकु दगु बारसे संजय सुखदेव,वक्ते सीना नवनाथ
शिंदे वैशाली विक्रम
याचा निवडणूकीत विजय झाला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऐन जी ठोंबळ सहायक निबंधक यांनी काम पाहीले तर त्यांना सहसचिव व सचिव आर एन राहणे यांनी मदत केली.


