पिंजरा व पाण्याची टाकी बसवण्याबाब यावी शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणची मागणी !!
कोपरगाव तालुक्यात जेऊर कुंभारी गावात गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीची अवस्था अतीश दयनीय झाली आहे.लोकसंख्येच्या दृष्टीने गाव मोठ आहे गावाला सर्व सुखसुविधा उपलब्ध होण्यासाठी शिवसुत्र युवा प्रतिष्ठाण या समाजिक संघटने ने वेळोवेळी निवेदन देऊन ही जेऊर ग्रामपंचायत कानाडोळा करत आहे अशी माहिती शिवसुत्र युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल गुरसळ यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की शिवसुत्र युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांनी स्मशानभूमीची दुरूस्ती व्हावी अशी मागणी वेळोवेळी केली आहे विविध जाती धर्माचे लोक अंत्यविधीसाठी जेऊर कुंभारी गावातील स्मशानभूमीचा वापर करतात आताची परिस्थिती बघता या स्मशानभूमीची अवस्था अतिशय दयनीय झाली असुन नागरीकांची गैरसोय होत आहे ग्रामस्थांना हात व पाय धुण्यासाठी पाण्याची टाकी बसवण्यात यावी तसेच पिंजऱ्याची डागडुजी करण्यात यावी व नागरिकांचा त्रास कमी करावा नाहीतर तिव्र प्रकारे आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिवसुत्र युवा प्रतिष्ठानच्या माध्यामातुन देण्यात आला.


