
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावचे प्रगतशील शेतकरी बाळासाहेब देवकर यांचे सुपुत्र तुषार देवकर यांना पशुवैद्यकीय पदवी मिळाल्यानंतर आज ते प्रत्यक्षात ग्रामीण भागामध्ये आपली सेवा देण्यास प्रारंभ करत आहे यावेळी तरुणांनी शेतीला जोडधंदा म्हणून विविध उद्योगांमध्ये पदार्पण करणं गरजेचे असुन ग्रामीण भागातील आजची परिस्थिती जर बघितली निर्सगाचा लहरीपणा तसे पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे शेती व्यवसाय करणे अवघड आहे तेव्हा तरुणांनी जोडधंदा म्हणुन उद्योग व्यवसायाकडे वळवावे असे प्रतिपादन जेऊर कुंभारी गावचे उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी केली.आज २३जुलै पासून तुषार बाळासाहेब देवकर यांनी ग्रामीण भागात आपली पशुवैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली त्यावेळी ते बोलत होते
या प्रसंगी उपसरपंच जालिंदर चव्हाण,बाळासाहेब होन, नानासाहेब वाणी,बाळासाहेब देवकर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


