
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायत मार्फत संपूर्ण गावात वृक्ष लागवड करणे मोहीम हाती घेण्यात आली आहे
वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीने जगावर थैमान घातले त्यावेळी ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात आले आहे वृक्ष लागवड करून निसर्गाचा समतोल राखता येईल या हेतूने आज गुरूवारदि. ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सरपंच सुवर्णा पवार ,उपसरपंच ताराचंद लकारे
यांच्या मार्गदर्शनाखाली जेऊर कुंभारी स्मशानभूमी,शालेय परिसर,रस्त्याच्या कडेला चिंच, कडुलिंब, वड पिंपळ, अशा विविध जातीच्या २०० झाडांची लागवड करण्यात आली
यावेळी
यावेळी ग्रामपंचायत सदस्य जालिंदर चव्हाण,यशवंत आव्हाड, किशोर वक्ते, प्रदीप गायकवाड अनिता वक्ते, जाधव गंगुबाई, वैशाली भोंगळे,धनश्री वक्ते, अनिता गायकवाड, ग्रामविकास अधिकारी केबी रणछोड, लिपी आनंद बारसे यांनी वृक्षारोपण केले सूत्रसंचालन प्रदीप गायकवाड यांनी केले तर आभार सरपंच सुवर्णा पवार यांनी मानले


