
कोपरगाव प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक बॅंकेच्या संचालक पदावर संस्थेच्या इतिहासात प्रथमच कोपरगावला संधी देत के. जे. सोमैया कॉलेजचे उपप्राचार्य श्री बाळासाहेब रामराव सोनवणे यांनी संस्थेच्या कोपरगाव तालुक्यातील पाहिले संचालक होण्याचा मान मिळविला आहे. त्यावेळी संचालक श्री बाळासाहेब सोनवणे व प्रा. भाऊसाहेब पा. कचरे
यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम जिल्हा प्रदर्शन हॉल कोपरगाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुरोगामी सहकार मंडळाचे जेष्ठ शिक्षक नेते प्रा भाऊसाहेब पाटील कचरे संस्थेचे चेअरमन श्री अशोकराव ठुबे व व्हाईस चेअरमन श्री धोंडिबा राक्षे तसेच जिल्ह्यातील सर्व संचालक व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री अशोक वारुळे सरांनी संस्थेची आर्थिक स्थिती व वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली. तसेच पुरोगामी सहकार मंडळाने कोपरगावला दिलेला शब्द पाळला याबद्दल प्रा. भाऊसाहेब कचरे व मंडळाचे आभार मानले
प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, कोपरगावला याआधी विरोधकांनी अनेकजणांना अनेक प्रकारचे शब्द दिले होते ते कोणीही पाळले नाही. कोपरगावला याआधी कोणीच उमेदवारी दिली नाही आमच्या मंडळानेच कोपरगावला उमेदवारी देऊन प्रा सोनवणे सरांना संचालक करून कोपरगावच्या सभासदांना न्याय देत त्यांचे स्वप्न पूर्ण केले. यापुढेही पुरोगामी सहकार मंडळ आपल्या सोबत राहील असे सांगितले. यावेळी श्री व सौ सोनवणे यांचा सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी श्री नारायण डुकरे बापूसाहेब भोसले, सुरेश बोळींज, अशोकराव ठुबे, मारुती धायतडक इत्यादीचे भाषण झाले. या कार्यक्रमासाठी जेष्ठ संचालक श्री सूर्यकांत डावखर, वाल्मीक बोठे, धनंजय म्हस्के, काकासाहेब घुले, सत्यवान थोरे, चांगदेव खेमनर, अशोकराव ठुबे, धोंडिबा राक्षे, अण्णासाहेब ढगे, अनिल गायकर, दिलीप काटे, कैलास रहाणे, म्हस्के मनीषा, कराळे आशा, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ श्री शैलेंद्र बनसोडे यांनी केले श्री अशोकराव वारुळे यांनी प्रास्ताविक केले तर नवनिर्वाचित संचालक श्री बाळासाहेब सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक बुधवंत, गोरखनाथ डोंगरे ,किशोर परदेशी, भाऊसाहेब होन, बापूसाहेब भोसले,राजेंद्र सोनवणे, सुभाष गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. सत्कार समारंभानंतर उपस्थितांना सुरुचि भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


