Sunday, April 5, 2026
Google search engine
HomeUncategorized५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेच्या कामासाठी१३१.२४ कोटीचा कार्यारंभ आदेश प्रसिद्ध...

५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेच्या कामासाठी१३१.२४ कोटीचा कार्यारंभ आदेश प्रसिद्ध दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचे समाधान -ना.आशुतोष काळे

 कोपरगाव प्रतिनिधी


२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोपरगाव शहरातील नागरिकांना आश्वासित करून कोपरगाव शहराचा जटिल झालेला पाणी प्रश्न कायमचा सोडून दाखवतो अशी ग्वाही दिली होती. त्यासाठी निवडून आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सहकार्याने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ५ नंबर साठवन तलाव व  वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधीस मंजुरी मिळविण्यात यश मिळवले व या निधीतून ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेच्या कामाचा कार्यारंभ आदेश देखील प्रसिद्ध झाला असून हे काम लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी मंगळवार (दि.५) रोजी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ते म्हणाले की,सत्ताधारी पक्षाचा आमदार झाल्यानंतर ५ नंबर साठवण तलावाचे काम समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीला करण्यास भाग पाडून प्राथमिक स्वरूपातील काम पूर्ण करून घेतले व पुढील कामासाठी आवश्यक अडलेल्या १३१ कोटी रुपयांच्या तांत्रिक खर्चाला मंजूरी देखील मिळवून  जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची वचन पूर्ती केली. काही दिवसांपूर्वीच कोपरगाव शहरातील एका कार्यक्रमात लवकरच ५ नंबर साठवण तलावाच्या कामाचे भूमिपूजन करणार असल्याचे अत्यंत विश्वासाने नागरिकांना सांगितले होते. कोपरगाव शहरातील नागरिक मागील अनेक वर्षापासून ज्या क्षणाची वाट पाहत होते तो आनंदाचा क्षण कोपरगाव शहरातील नागरिकांना देऊ शकलो याचे मोठे समाधान वाटत असून शहरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महात्मा गांधीच्या चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, सुनील शिलेदार, कृष्णा आढाव, रमेश गवळी, अॅड. विद्यासागर शिंदे, संदीप कपिले, दिनकर खरे, वाल्मीक लाहीरे, शैलेश साबळे, राजेंद्र वाघचौरे, अशोक आव्हाटे, राहुल देवळालीकर, गणेश बोरुडे, सचिन गवारे, इम्तियाज अत्तार, संदीप सावतडकर,अमीन शेख, फकीर कुरेशी, धनंजय कहार. शुभम लासुरे, निखिल डांगे, डॉ. तुषार गलांडे, भाऊसाहेब साठे, बाळासाहेब रुईकर, अंबादास वडांगळे, सचिन परदेशी, नारायण लांडगे, सुनील बोरा, प्रकाश दुशिंग, संतोष चव्हाणके कार्तिक सरदार, जावेद शेख,  एकनाथ गंगुले, किरण बागुल, शफिक शेख, राजेंद्र आभाळे, सोमनाथ आढाव, राजेंद्र बोरावके, योगेश वाणी आदी उपस्थित होते.
चौकट -कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न जेवढा जिव्हाळ्याचा तेवढाच संवेदनशील होता.  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न चांगलाच गाजत होता. ५ नंबर साठवण तलावाचे काम होऊन शहराचा पाणी साठा वाढल्यास शहरवासीयांना नियमित पाणी पुरवठा होवू शकतो. याची खात्री असल्यामुळे केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पाठबळ मिळाले. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळवली व आज त्या कामाचा कार्यारंभ आदेश प्राप्त होवून दिलेला शब्द पूर्ण केल्याचे मोठे समाधान मिळत आहे.-ना.आशुतोष काळे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!