Saturday, April 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोपाळे मंगला यांचा सामाजिक व शैक्षणिक काम बद्दल गौरव!!

गोपाळे मंगला यांचा सामाजिक व शैक्षणिक काम बद्दल गौरव!!

कोपरगाव प्रतिनिधी

दिनांक ५ जून २०२२ रोजी , जागतिक पर्यावरण दिन तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण तसेच सामाजिक कार्य करीत असलेल्या राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशिय संस्था, भारत संघटनेच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित दोन दिवशीय राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन अधिवेशन २०२२ व राष्ट्रीय पुरस्कार वितरण चे भव्य आयोजन , राळेगणसिद्धी,ता.पारनेर,जि.अहमदनगर या ठिकाणी थोर समाजसेवक पद्मश्री डॉ.अण्णासाहेब जी हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ४ जून व ५ जून रोजी, अतिशय उत्साहात, शांततेत पार पडला.

या दोन दिवशीय राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन अधिवेशनात संपुर्ण देशांत पर्यावरण तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असलेल्या पर्यावरण सेवक, समाजसेवक यांना राष्ट्रीय पर्यावरण मित्र,राष्ट्रीय समाजरत्न, राष्ट्रीय हिरकणी, राष्ट्रीय आदर्श शिक्षक, राष्ट्रीय अन्नदाता, राष्ट्रीय पक्षीमित्र,राष्ट्रीय पर्यटन भूषण तसेच उत्कृष्ट कवी कवयित्री यांना राष्ट्रीय काव्यरत्न पुरस्कार इत्यादी विविध पुरस्काराने केलेल्या कार्याचा गौरव म्हणून तसेच यापुढेही पर्यावरण साठी समाजासाठी कार्य कराल या हेतूने सन्मानित करण्यात आले.
त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहादराबाद ता.कोपरगाव येथील श्रीम.मंगला साहेबराव गोपाळे यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल तसेच उत्कृष्ट कवियत्री म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.त्यांनी पर्यावरणाबरोबर शैक्षणिक क्षेत्रात ही त्यांचे काम अतिशय चोख व आगळ्या वेगळ्या प्रकारे करीत आहेत.
या भव्य दोन दिवशीय राष्ट्रीय अधिवेशनात संमेलन उद्घाटक म्हणून थोर समाजसेवक मा.अण्णासाहेब जी हजारे तसेच संमेलन अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री.देवा तांबे व सचिव दिपक काळे उपस्थित होते.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रायणी सेवा फौंडेशन चे अध्यक्ष श्री.विठ्ठल शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते विश्व वारकरी सेना चे हभप. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, माजी आयुक्त तसेच माजी जलसंधारण सचिव श्री.प्रभाकर देशमुख,माजी सभापती पंचायत समिती खटाव चे श्री.संदीपदादा मांडवे,ग्रीन सोशियल फौंडेशन च्या अध्यक्षा सौ.अनुराधा ताई देशमुख,सामाजिक कार्यकर्त्या डॉ.प्रियाताई शिंदे,सामाजिक कार्यकर्त्या सौ.अरुणा ताई बर्गे तसेच पर्यावरण मित्र बहुउद्देशिय संस्थेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा.श्री.रमेश शेंडे,राज्य संघटक श्री.गोकुळ देवरे,सांप्रदाय विभाग अध्यक्षा हभप.सौ.पुनमताई जाचक तसेच संस्थेचे महाराष्ट्र राज्य नियोजन समिती पदाधिकारी, संस्थेचे राजस्थान राज्य अध्यक्ष श्री.मुलाराम बाणा,छत्तीसगढ राज्य सचिव श्री.महेश कुमार साहू तसेच देशातील संस्थेचे तालुके, जिल्हे, राज्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीम.गोपाळे मंगला यांचा ५जून रोजी गुरुकुल नारीशक्ती पुरस्काराने ही त्यांना गौरवण्यात आले.हा पुरस्कार त्यांना आदरणीय प्रशांत मोरे कवी यांच्या हस्ते देण्यात आला.त्यांनी हे दोन्ही पुरस्कार मिळल्यानंतर आपली जबाबदारी नक्कीच वाढली आहे असे मत व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!