
काळे गटाने सत्ता मिळवत जिल्हा बँक निवडणूकी नंतर केले ४ थे सत्तांतर!!

सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकामध्ये काळे गट हळूहळू आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. जिल्हा बँकेवर काळे व कोल्हे जरी संचालक म्हणून कार्यरत असले तरी सोसायट्यांच्या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर झालेले चौथे सत्तांतर खूप काही सांगून जात आहे हे विसरून चालणार नाही.यापूर्वी देखील तीन सोसायटीच्या निवडणुकीत काळे गटाने कोल्हे गटाला धक्का देत सत्ता मिळविली आहे. व नुकत्याच पार पडलेल्या वारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत देखील १३ पैकी १२ जागा जिंकत कोल्हे गटाचा दारुण पराभव करून वारी सेवा सोसायटी ताब्यात घेतलीआहे.बहुतांश सेवा सोसायट्यांच्या निवडणुकीत अनेक सोसायट्यामध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता राखली आहे मात्र काळे गट हळूहळू कोल्हे गटाची एक एक सोसायटी आपल्या ताब्यात घेत आहेत.माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वारी सेवा सोसायटीची निवडणूक लढविण्यात आली.या निवडणुकीत १२ जागांवर विजय मिळवून काळे गटाने सत्ता काबीज केली आहे.या निवडणुकीत काळे गटाचे निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे नवनाथ छबुराव जाधव, वाल्मिक खंडू जाधव, मधुकर निवृत्ती टेके, संजय सुभाष जाधव, मच्छिंद्र शंकर टेके, आप्पासाहेब बाजीराव मलिक, चांगदेव शुकलेश्वर शिरसाठ, गोकुळ ताराचंद पलघडमळ, लता सुधाकर टेके, लताबाई मधुकर गोर्डे, रावसाहेब चांगदेव टेके, दीपक कचरू गायकवाड यांचा समावेश आहे.निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचे व निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे. वारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर जल्लोष करतांना काळे गटाचे कार्यकर्ते.



