
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या वडगाव गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी नुकताच श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या सर्व कार्यकर्त्यांचे ना. आशुतोष काळे यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यामध्ये वडगाव येथे मागील अनेक वर्षापासून कोल्हे गटाचे काम करीत असलेल्या अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांचा समावेश आहे.बाळासाहेब माळी, संदीप माळी, चांगदेव पवार, दिपक माळी, राहुल वाकळे, अविनाश आव्हाड, गणेश पवार, भाऊराव बर्डे व अक्षय बर्डे या भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षात प्रवेश केला आहे. अडीच वर्षात ना. आशुतोष काळे यांनी प्रतिकूल परिस्थितीत मतदार संघाचा विकास केला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी वडगावचे सरपंच सोमनाथ कांगणे, किशोर डोंगरे, संदीप सांगळे,प्रदीप कांगणे, दत्तात्रय बारगळ, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रवीण कांगणे आदी मान्यवरउपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या भाजप कार्यकर्त्यांचे स्वागत करतांना ना. आशुतोष काळे.


