Friday, April 3, 2026
Google search engine
HomeUncategorized५ नंबर साठवण तलाव काळाची गरजच होती !!-अॅड. सौ.रश्मी कडू

५ नंबर साठवण तलाव काळाची गरजच होती !!-अॅड. सौ.रश्मी कडू

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला होता. त्याप्रमाणे शहराची लोकसंख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली होती व शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील दिवसेंदिवस जटील होत चालला होता. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकासाठी नियमित पाणी मिळणे हे दिवा स्वप्नच राहणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु ना. आशुतोष काळेंनी ५ नंबर साठवण तलावासाठी १३१.२४ कोटी निधीस प्रशासकीय मंजुरी मिळविल्यामुळे कोपरगावकरांना मोठा दिलासा दिला मिळाला असून ५ नंबर साठवण तलाव हि कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी काळाची गरजच होती असे स्पष्ट मत जिजाऊ महिला मंडळाच्या उपाध्यक्षा अॅड. सौ.रश्मी कडू यांनी मांडले आहे.
कोपरगाव शहरातील नागरिकांना मागील अनेक वर्षापासून चार, सहा, आठ, दहा दिवसांनी तर उन्हाळ्यात कधी-कधी १६ दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. अनेकवेळा आश्वासने दिली गेली मात्र आजपर्यंत पूर्ण झाली नाही. त्यामुळे आलीया भोगासी, असावे सादर अशीच काही परिस्थिती शहरातील नागरिकांची झाली होती. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. त्याचा विशेषत: महिला भगिनींना मोठा त्रास सहन करावा लागत होता.मात्र दाद तरी कुणाकडे मागावी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत होता त्यामुळे निमुटपणे सहन केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत ना. आशुतोष काळे यांनी २०१९ च्या निवडणुक प्रचारादरम्यान कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. 
  कोपरगाव शहरासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी साठा मंजूर असूनही जुनी झालेलीं वितरण व्यवस्था व साठवण क्षमता नसल्यामुळे कोपरगाव शहराच्या नागरिकांना नियमित पाणी मिळूच शकत नाही हि पाणी प्रश्नाची नेमकी मेख ना. आशुतोष काळे जाणून होते. झपाट्याने होत असलेला कोपरगाव शहराचा विस्तार त्यामुळे भविष्यातील शहराची वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नागरिकांना नियमित पाणी द्यायचे असेल साठवण क्षमता वाढवून जुनाट झालेलीं वितरण व्यवस्था बदलावी लागणार होती. त्यासाठी निधी देखील मोठ्या प्रमाणात लागणार असला तरी पाणी प्रश्न कायमचा निकाली निघणार होता. त्यामुळे ना. आशुतोष काळे यांचा पहिल्यापासून ५ नंबर साठवण तलावाबाबत आग्रह होता. त्यामुळे त्यांनी निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीत सुद्धा ५ नंबर साठवण तलावाबाबत आपली भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे निवडून येताच कोपरगावकरांना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी एकेक मंजुरी मिळवून १३१.२४ कोटीची प्रशासकीय मंजुरी देखील मिळविली आहे. नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी ५ नंबर साठवण तलाव हा मैलाचा दगड ठरणार असून कोपरगाव शहरवासियांसाठी ५ नंबर साठवण तलाव काळाची गरजच होती असे अॅड. सौ.रश्मी कडू यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!