
गोदावरी नदीसह परिसराची केली स्वच्छता!!
कोपरगाव प्रतिनिधी
ग्रामीण भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात श्रमदान चळवळ अस्तित्वात होती. त्यातून गावच्या स्वच्छतेबरोबरच विधायक कामे केली जात होती.अलीकडच्या काळात हे दिसून येत नाही. मात्र, अशाही काळात वारीतील तीन संस्था स्वयप्रेरणेतून एकत्रित येऊन गेल्या तीन आठवड्यापासून ग्रामस्वच्छता अभियान राबवित गावची स्वच्छता करीत आहेत. निश्चितच या कार्याची प्रेरणा घेत संपूर्ण तालुक्यात प्रशासणाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविणार असल्याचे कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी म्हंटले आहे. कोपरगाव तालुक्यातील वारी येथील ग्रामपंचायत कार्यालय, जय बाबाजी भक्त परिवार तसेच राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे अमृत महोत्सवीवर्षानिमित्त वारीत सोमवारी (दि.२८) सकाळी ६ ते ८.३० यावेळेत महाश्रमदान सोहळा व परिसर स्वच्छता अभियान “सप्ताह तिसरा” यशस्वीपणे राबविण्यात आले. या अभियानात स्मशानभूमी, गोदावरी नदी घाट परिसर या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करण्यात आला तर काही कचरा पेटून देण्यात आला. या अभियानात कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी भेट देऊन स्वतः पूर्णवेळ श्रमदान करून स्वच्छता केली तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या अभियानात वारीचे सरपंच सतीशराव कानडे, ग्रामविकास अधिकारी दिलीपराव वारकर, जय बाबाजी भक्त परिवाराचे भाऊसाहेब टेके, सामाजिक कार्यकर्ते मधुकर टेके, जीत अकॅडमीचे संचालक जितेंद्र टेके, “लोकमत” चे उपसंपादक रोहित टेके, सेवानिवृत्त अधिकारी रावसाहेब जगताप साहेब, विलास गाडेकर, गणपत सोनवणे, साईराज टेके, अनुराग टेके तसेच ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब वाघ, सतीश गायकवाड, विलास जगधने, मछिंद्र गागरे, उषाताई बागुल, नंदाताई महिरे, शेषराव रगडे, पोपट बनकर, यांच्यासह गावातील स्वच्छता प्रेमींनीं यात सहभागी होऊन गाव स्वच्छतेच्या या अभियानात आपले श्रम रुपी योगदान दिले. अशा वीस पेक्षा जास्त स्वच्छता प्रेमींनीं यात सहभागी होऊन गाव स्वच्छतेच्या या अभियानात आपले अनमोल असे योगदान दिले आहे.
वारीत महाश्रमदान सोहळा व परिसर स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.


