
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यात जेऊर कुंभारी गावात अज्ञात दोन मुलांकडून मोहळ काढण्याच्या प्रयत्नाने एक एकर ऊस जळून खाक झाला .
त्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
सावित्रीबाई शिवाजी वक्ते यांनी सर्वे नंबर ९२\२ या क्षेत्रात मध्ये
एक एकर ऊस २६५ जातीच्या उसाची लागवड केली व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याला ऊसाची नोंद करण्यात आली होती काही ऊस मजुरांनी तोडून नेला होता दोन-तीन दिवसात ऊसतोडणीसाठी मजूर येणार होते मात्र त्यापूर्वीच दोन अज्ञात मुलांनी मोहोळ काढण्याच्या अतिउत्साहामुळे ऊसाला आग लागली आगीचा लोळ मोठ्या प्रमाणात असल्याने काही समजण्याच्या आतच ऊसाने पेट घेतला निलेश शिवाजी वक्ते हे दुसऱ्या शेतात काम करीत असताना त्यांना ऊस पेटलेला दिसला त्यांनी तात्काळ फोनवरून शिवाजी यादव वक्ते व संजय वक्ते,बाळासाहेब पवार ,योगेश वक्ते यांना माहिती दिली ऊस विझवण्यासाठी संजीवनी च्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.तसेच ग्रामस्थांनी घटना स्थळी धाव घेतली यामध्ये संजय वक्ते, बाळासाहेब पवार, शिवजीराव वक्ते, योगेश वक्ते,निलेश वक्ते, पवन वक्ते, युवराज वक्ते
यांनी
उसाचे वाढे यांच्या साहाय्याने ऊसाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अधिक पेट घेतल्यामुळे ऊस जळून खाक झाला.


