
कोपरगाव प्रतिनिधी
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले त्यानिमित्ताने जेऊर कुंभारी गावात मारूती मंदिर परिसरात रविवारी दि. २० मार्च रोजी सर्वपक्षीय श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी कोल्हे यांच्या प्रतिमेचे उपस्थितांच्या यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.
विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सचिव,पुरणगाव शाळेचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे, काॅग्रस तालुका अध्यक्ष नितीन शिंदे,पारजी शिंदे दत्तात्रे आव्हाड, महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, माजी सभापती शिवाजी वक्ते, मधुकर वक्ते, आर पिआय अध्यक्ष दिपकराव गायकवाड, गौतम बाॅकचे संचालक धोंडीराम वक्ते. भाजपा युवा उपअध्यक्ष सुधाकर वक्ते, पोलिस पाटील बाळासाहेब गायकवाड,राजेंद्र गिरमे, विजय रोहम, लक्ष्मण वक्ते, अशोक राऊत,विजय गिरमे,
रावसाहेब वक्ते, सोपानराव वक्ते, कोंडीराम वक्ते, कल्याणराव गुरसळ,शामराव वक्ते, महेंद्र वक्ते, किशोर वक्ते, दादासाहेब चव्हाण, राजेंद्र पगारे, सचिन आव्हाड आमोल दौंड,काशिनाथ वक्ते, किरण शिंदे, पोपट शिंदे, रावसाहेब गोसावी, गिरीधर गुरसळ, तुषार गुरसळ, विशाल गुरसळ,नारायण गुरसळ,नाना मोहीते, परशराम गुरसळ, किरण गुरसळ आदी उपस्थित होते.
या प्रसंगी पुरणगाव शाळेचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे यांनी बोलतांना असे सांगितले की शंकरराव कोल्हे यांनी जेऊर कुंभारी चा कॅलिफोर्निया केला शेतीसाठी शेतकऱ्यांना वेळेवर पाट पाणी पाणी मिळावे यासाठी शंकरराव कोल्हे यांनी पाटबंधारे विभागाशी नेहमी संघर्ष केला साहेबांनी केलेल्या प्रयत्नामुळे जेऊर कुंभारी पंचक्रोशीतल शेतकऱ्यांना शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी वेळेवर मिळत होते तसेच जेऊर कुंभारी गावाच्या विकासासाठी पाण्याची तळे बंधारे रस्ते अशा अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास साहेबांचा मोठा वाटा आहे
साहेबांच्या जाण्याने शेतकऱ्यांचा नेता हरपला असे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम चे सचिव पुरणगाव शाळेचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे यांनी आपले मत व्यक्त केले.
तर माजी सरपंच राजेंद्र गिरमे
यांनी सांगितले की कै.शंकरराव काळे व कै.शंकरराव कोल्हे यांनी आपले राजकीय मतभेद विसरून एकत्र येण्याचा जो आदर्श राज्यात निर्माण केला आहे त्याचे अनुकरण सर्वांनी करणे गरजेचे आहे असे सांगुन कोल्हे साहेब यांच्या आठवणींना उजाळा याप्रसंगी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना जेऊर कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली
.यावेळी शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणचे सर्व सदस्यां व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.


