
कोपरगाव प्रतिनिधी
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री शंकरराव गेनुजी कोल्हे यांचे बुधवार दि १६ मार्च रोजी पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले.असून त्यांचा अंत्यविधी चा आज सायंकाळी ४.३० वाजता संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज इथे होणार आहे.
राज्यासह जगभरात कोराना या महाभयंकर आजाराने थैमान घातले असताना माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना देखील या आजाराने ग्रासले होते त्यांच्या वयोमानानुसार ते या आजारातून बरे होतात की नाही ही शंका सर्वांनाच लागली होती परंतु साहेबांची इच्छाशक्ती प्रबळ असल्याने ते कोरोनाला हरवून सुखरूप पणे बरे होत परत एकदा त्याच जोमाने उभे राहिले
कोपरगाव तालुक्यातील येसगाव या छोट्याशा गावी जन्मलेले शंकरराव कोल्हे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात वयाच्या एकविसाव्या वर्षी गावचा सरपंच म्हणून केली पुण्यात त्यांनी बी.एससी कृषी ही पदवी मिळवली त्या काळात भारत सरकारच्यावतीने शेतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी २५ विद्यार्थ्यांना अमेरिकेला पाठवणार होते त्यात साहेबांचा नंबर लागला तेथून परत आल्यावर गावाकडे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत शेती करायला सुरुवात केली आणि यातून त्यांनी आपल्या मित्रांसोबत कोपरगावला सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचे धाडस करत वयाच्या तिसाव्या वर्षी त्या कारखान्याचे चेअरमन झाले.


