
कोपरगाव प्रतिनिधी
जनसामान्यांत कायदेविषयक जागृति यावी तसेच शासकीय-निमशासकीय कार्यालयातील त्यांच्या हक्क व अधिकारांची जाणीव व्हावी यासाठी लवकरच विविध ठिकाणी कायदेविषयक जनजागृति मोहीम राबविणार असल्याची माहिती ॲड. आकाश एस. ठोळे यांनी दिली.
यावर्षात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीय लोक अदालत मधे राज्यभरात १६ लाख ६८ हजार २५२ वादपूर्व प्रकरणे व ८२ हजार ३५९ प्रलंबित प्रकरणे असे एकूण १७ लाख ५१ हजार २११ निकाली काढण्यात आली येत्या काळात विविध माध्यमातून लोकांना लोक अदालतीचे महत्व पटवून दिले जाईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जेष्ठ विधिज्ञ संजय बत्तीसे, एच. एम. पठान, आर. डी. शिरसाठ, एन. आर. गायकवाड तसेच इम्रान खान, एस. एस. मगर, एस. एन. गोरे, एस. एस. जेजुरकर, संतोष गावडे, पी. आर. बत्तासे, सईद अली, इफ्तेखार शेख, पवन राजपूत, मनोज भंडारे, विष्णु सवाई, ए. ए. रोठे, रईस शेख, एस. बी. कटारे, डी. एम. अंभोरे, के. एन. हरिदास, एन. आर. बोराडे, एस. जे. कोठारी, ए. आर. मालपाणी, अशोक सोनवणे, सूरज राजपूत, किशोर मतसागर, के. एन. हरिदास उपस्थित होते.


