Friday, April 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedजगात कुठलीही महिला आबला नाही!!- श्रीमती भाग्यश्री बनायात

जगात कुठलीही महिला आबला नाही!!- श्रीमती भाग्यश्री बनायात

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव शहरातील श्री साई वासल्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोरोना कालावधीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व राज योगिनी ब्रम्हकुमारी सरला दीदी, उमाताई वहाडणे,श्रीमती मंगलताई कोते,आदर्श शिक्षिका कुंदाताई पाटील, छायाताई पाटील,नगरसेविका प्रतिभा शिलेदार,नगरसेविका सपना मोरे , किरण डागा, मुंबई ग्राहक संरक्षण कक्षाच्या ऋतिका पन्नागुडे मनीषा राऊत,छाया पाटील, मंदाताई, पाटील,डॉ.वर्षा झवंर, भावना गवांदे सीमा पानगव्हाणे,अर्जुनराव चौधरी ग्लोबल महाराष्ट्राचे संपादक शिवाजीराजे शिंदे, प्रशांत चौधरी आदिसह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रत्ना चांदगुडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की माझ्यावर अनेक दुःखाचे आघात झाले त्यावर मात करुन अपंग, वृद्ध, निराधारांच, जे दुःख असतं ते मला झालेल्या आघातामुळे कळाले असे दुःख कोणावर येऊ नये किंवा ज्यांच्यावर आले आहे त्यांना त्यातून सावरण्या करिता या संस्थेची स्थापना केली आहे.
तसेच श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत आपल्या मनोगतात म्हणाल्या की आपण महिला दिन का साजरा करायचा ३६५ दिवस आपलेच असतात ना मग आपण महिला दिनच का साजरा करायचा हा दिवस याचं कारण असं आहे की एक दिवस आपण आपल्यासाठी आनंद घेण्यासाठी निवडावा हाच मागचा खरा हेतू असतो कारण जगात कुठेही असं क्षेत्र नाही की तिथे महिला नाही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला असे कुठलेही क्षेत्रात राहीले नाही राष्ट्रपती सायंटिस्ट डॉक्टर इंजिनिअर असे कुठलेही क्षेत्र नाही त्या ठिकाणी महिलांनी आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आता व जगात कुठलीही महिला आबला नाही आज पुरुष या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रात महिलादेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज काम करत आहे असे तुम्हाला वाटते का ही प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत जगात असे कुठलेही क्षेत्र दाखवा की त्या ठिकाणी महिला नाही असे श्रीमती बनायात म्हणाले.
शेवटी ब्रह्मकुमारी सरला दिदी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की रत्नाताईंना परमेश्वर खूप यश देवो फक्त यशच नाहीतर अनेकांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत आजच्या कलियुगाच्या काळामध्ये वात्सल्याची खूप कमी आहे कुटुंबामध्ये सुद्धा व समाजामध्ये सुद्धा स्वतःच्या मनासाठी सुद्धा वात्सल्याच्या विचार द्यावे लागतात पॉझिटिव्ह विचारा शिवाय सुखी राहू शकत नाही रत्नाताईंनी कुटुंबामध्ये फार संघर्ष केला ते आपणाला माहीतच आहे पतीने देहत्याग केला मुलाने देहत्याग केला अशा परिस्थितीत एखादी स्त्रि काय विचार करू शकते की देवाने माझे किती वाईट केले मी किती दुर्दैवी आहे लहानपणापासून जन्मापासून असं मूल दिलं असे दुर्दैवाची रडणे रडत बसली असती एखादी स्त्री मात्र रत्नाताई नी या सर्व गोष्टीला झुगारून सर्व गोष्टीवर मात करून आपल्यापुढे एवढे मोठे संघटन तयार केले. ही तर सुरवात आहे यापुढेही त्यांची खूप प्रगती होणार याची मला शास्वती आहे आम्ही ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने त्यांच्यासाठी रोजच प्रार्थना करत राहु असे सरला दीदी आपल्या मनोगतात शेवटी म्हणाल्या.कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता देवीसिंग परदेशीं,वैष्णवी प्रशांत चौधरी, सविता साळुंखे, सुप्रिया गर्जे, शोभाताई सातभाई, मंदाताई चौधरी,रिजवाना शेख,मोहसीना तांबोळी आदिनी विशेष परिश्रम घेतली.होते.यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका , महिला पोलीस कॉन्स्टेबल,शिक्षिका आरोग्य विभाग महिला कर्मचारी, महिला वकील, आदीसह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच महिलांचा श्री साई वासल्य बहुद्देशीय संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्षा रत्नमाला कृष्णराव चांदगुडे यांनी सन्मान करून त्यानां भेटवस्तुचे वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!