
कोपरगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. संतानी समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम केले. संत जगनाडे महाराजांनी संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानले होते. श्री संत जगनाडे महाराज जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते व चौदा टाळरकऱ्यांपैकी एक विश्वासू टाळकरी होते. संत जगनाडे महाराजांनी तुकाराम महाराजांच्या साहित्याचा अनमोल साठा जगाला दिला असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थांनच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव येथे संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्यापारी धर्मशाळेत आयोजित कार्यक्रम प्रसंगी श्री संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, तेली समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असून श्री संत जगनाडे महाराज मंदिराच्या सभामंडपासाठी १० लाख रुपये निधी दिला असून लवकरच या कामास प्रारंभ होणार आहे. भविष्यात देखील निधीची गरज भासल्यास निधी देवू अशी ग्वाही दिली.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक मंदार पहाडे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,तेलीसमाज जिल्हा अध्यक्ष रमेश गवळी,फकीर कुरेशी, दिनकर खरे, डॉ. तुषार गलांडे, राहुल देवळालीकर, जावेद शेख,संदीप कपिले, धनंजय हार, वाल्मिक लहिरे, मनोज नरोडे, राहुल राठोड,शिवाजी लकारे, प्रमोद गव्हाणे, विलास वालझाडे, रामदास गायकवाड, युवराज सोनवणे, राजेंद्र राऊत, राजेंद्र व्यवहारे,संतोष शेलार, विजय खडांगळे, निलेश धारक, ज्ञानेश्वर लोखंडे, सागर सोमवंशी,चेतन सोमवंशी, राजेश वलझाडे,बाळासाहेब राऊत, अनिल दुधे, ज्ञानेश्वर महापुरे, गोविंद सोनवणे, प्रमोद कवाडे,सुरेश सोनवणे, राजेंद्र राऊत, अंकुश महाले आदींसह तेली समाज बांधव व नागरिककोरोनाचे नियम पाळून उपस्थित होते.
श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्यापारी धर्मशाळेत आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलतांना आ. आशुतोष काळे.


