
कोपरगाव प्रतिनिधी
रक्तदान हे श्रेष्ठ दान असे समजून गरजवंताला रक्त देण्याची जिद्द मनाशी बाळगून भाजपा दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष श्री.मुकुंदमामा काळे यांनी तब्बल ३६ वेळा रक्तदान केले आहे.दिव्यांग असतांना देखील स्वतःच्या शारिरिक कमतरतेवर मात करून नवा आदर्श काळे यांनी समाजासमोर ठेवला आहे.भाजपा प्रदेश सचिव मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी दिव्यांग बांधवांना मदत कार्याचा ओघ सुरू केला त्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हा दिव्यांगांना समाजात मान सन्मान मिळू लागला असे सांगताना काळे हे भावुक झाले.मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सामाजिक भावनेतून प्रत्येक काम करणासाठी नेहमी साथ व प्रेरणा दिली आहे.त्यामुळे कोणत्याही गरजू व्यक्तीला मदतीला धावून जाण्यात आम्हाला कमीपणा वाटत नाही असेही काळे म्हणाले आहेत.
रुग्णाला रक्ताची गरज असते त्या वेळी त्यांचे नातेवाईक यांची मोठी धावपळ होते.आवश्यक रक्तगटाच्या रक्ताची बॅग अनेकदा उपलब्ध नसल्यावर गोंधळ उडतो,मात्र त्यात मुकुंद काळे यांच्यासारखे रक्तदाते हे जणू देवदूतच वाटतात कारण स्वतःच्या दिव्यांग असण्याची तमा न बाळगता तब्बल ३६ वेळेला रक्तदान करून ३६ रुग्णांचा जीव सुखरूप ठेवण्यात काम केलेले दिव्यांग बांधवांचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्यात एवढे वेळेला रक्तदान करणारे काळे हे एकमेव दिव्यांग असावे असेही म्हणाले तरी नवल नसावे.धडधाकट असणारी माणसे आज माणसांसाठी पुढे येत नाही त्यात काळे यांनी आजवर दाखवलेली ही तप्तरता सर्वांना आदर्श घेण्यासारखी आहे.सर्व स्तरातून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व अभिनंदन करण्यात येत आहे.


