Wednesday, April 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedसमताचा १५० कोटी रुपयांचा सोनेतारण कर्ज वाटपाचा टप्पा पार!!

समताचा १५० कोटी रुपयांचा सोनेतारण कर्ज वाटपाचा टप्पा पार!!

कोपरगाव प्रतिनिधी

बँकींग व फायनान्स क्षेत्रात सोनेतारण कर्ज सर्वात सुरक्षित कर्ज समजले जाते या प्रकारच्या कर्जात खाजगी फायनान्स कंपन्यानी सुरक्षित कर्ज वाटपाचे क्षेत्र परप्रांतातील खाजगी फायनान्स कंपन्यांनी व्यापलेले आहे परंतु या सोनेतारण कर्जाच्या व्यावसायात समता नागरी सहकारी पतसंस्थेने मोठी झेप घेतली असून गत दिड वर्षात आजपर्यंत १५० कोटी रुपयांचा सोनेतारण कर्जाचा टप्पा पार करीत
महाराष्ट्रातील नागरी सहकारी पतसंस्थांमध्ये समताने सर्वात जास्त सोनेतारण कर्ज वाटप करणारी समता पतसंस्था ही क्रमांक एकची पतसंस्था ठरली आहे.समताच्या एकूण कर्ज वाटपापैकी ३५% कर्ज वाटप सोनेतारण कर्ज असल्याची माहिती समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली.
समताच्या १५० कोटी रुपयांचा सोनेतारण कर्ज वाटपाचा टप्पा पार करीत असताना संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व सोनेतारण गोल्ड व्हॅल्यूअर यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
प्रसंगी समताचे सरव्यवस्थापक श्री सचिन भट्टड म्हणाले की,सोनेतारण कर्जातील जोखिम कमी करण्यासाठी प्रत्येक महिन्यातून एक वेळा सोनेतारणाचे पुनःमूल्यांकन करण्याची पद्धती समता ने अवलंबविली आहे तसेच या सोनेतारण कर्जाच्या सुरक्षिततेसाठी फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम तयार करून त्याद्वारे सर्व शाखांचे सोनेतारणाचे ऑनलाईन सीसीटीव्ही द्वारा प्रत्येक मिनिटाला निरीक्षण केले जाते.
याबाबत अधिक बोलताना समताचे संचालक श्री संदीप कोयटे म्हणाले की, सोनेतारण कर्जाची घरपोहच सुविधा समता सुरू करीत आहे तसेच सोनेतारण कर्जाचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी व कामकाजात वेग येण्यासाठी जागतिक दर्जाच्या सॉफ्टवेअर कंपन्या सोबत करार करण्यात येणार आहे यापूर्वी पतसंस्था मालमत्ता तारणावर कर्ज देत होत्या परंतु कर्जदार कर्ज थकबाकीत गेल्यानंतर ते कर्ज बुडविण्याच्या उद्देशाने संस्थेविरुध्द तक्रारी करण्याचे प्रमाण वाढले आहे आपण घेतलेले कर्ज माफ करावे किंवा त्यात सूट मिळावी या उद्देशाने थकबाकीदार संस्थेविरुध्द तक्रारी करत असतो समताची थकबाकी वसुलीची पद्धत कायदेशीर परंतु कठोर आहे त्यामुळे थकबाकीदारांनी केलेल्या तक्रारींचा सामना समता ला नेहमीच करावा लागतो परंतु ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने समता यापुढेही आपले कठोर वसुलीचे धोरण,धोरणाची पद्धत सुरूच ठेवणार असल्याची माहिती समताचे असिस्टंट जनरल मॅनेजर (वसुली विभाग) श्री जनार्दन कदम यांनी दिली.
याप्रसंगी समताच्या सोनेतारण विभागाचे प्रमुख श्री विवेक नगरकर, श्री कैलास कवाडे, श्री विशाल ठोळे यांचा सत्कार समताचे जेष्ठ संचालक श्री जितुभाई शहा, श्री अरविंदजी पटेल, श्री चांगदेवजी शिरोडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच सोनेतारण व्हॅल्यूअर श्री अनिल जाधव, श्री आनंद भडकवाडे, श्री सुरज वडनेरे,श्री शेखर भडकवाडे यांचाही सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!