
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहरात रविवार (दि.२६) रोजी साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मोठ्या उत्साहात आगमन झाले असता श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्रपणे अभिवादन करून स्वागत केले.
यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा कोपरगावात आल्याचा मनस्वी खूप आनंद होत आहे. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समाजातील दुर्बल, वंचित, पिडीत, कष्टकरी बांधवांच्या जगण्याचे वास्तव मांडले.समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. राज्यात वैचारिक, समाजिक, साहित्यिक क्रांती घडवण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. तमाशा कलेला लोकनाट्य कलेची प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, गौतम बँकेचे संचालक सुनिल शिलेदार, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निखिल डांगे, कृष्णा आढाव, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, सुनील बोरा, राहुल देवळालीकर, जावेद शेख, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, चंद्रशेखर म्हस्के, सचिन परदेशी राजेंद्र आभाळे, धनंजय कहार, वाल्मिक लाहीरे, संदीप देवळालिकर, गणेश लकारे, आकाश डागा, अॅड.मनोज कडू, दिनेश पवार, मनोज नरोडे, बाळासाहेब पवार आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


